शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

आगामी तीन दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात कमी दाबाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा व ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अरबी समुद्रात तीन समुद्रस्तरापासून तीन किमीपर्यंत हवेचा दाब तयार झाला आहे. तसेच समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात मोठा बदल झालेला दिसून येत आहे.

हिवाळ्यात अनुभवायला मिळणार पावसाळा

यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटीन भाषेत ‘ला लिना’ असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे बाष्पयुक्त वाºयांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाची स्थिती राहणार आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यासह जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील यंदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गहू, हरभऱ्याला फायदा मका, ज्वारीला मात्र फटका

अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या पिकाला काही प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मक्यावर व ज्वारीवर कीड पडण्याची भीती आहे. यासह भाजीपाल्याचा पिकांवरदेखील या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू व हरभरा आता प्राथमिक स्वरूपात आहे. यामुळे गव्हाला पाण्याची गरजच आहे. त्यातच पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होत आहे.

सीसीआयने कापूस खरेदी थांबली

दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तसेच आगामी तीन दिवसदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सीसीआयने कापसाची खरेदी थांबवली आहे. तरीही अनेक केंद्रांवर शेतकरी आपला माल विक्रीसाठी रांगेत लागला आहे. पावसामुळे कापूस ओला होण्याची शक्यता आहे. यामुळे सीसीआयने शुक्रवारपर्यंत खरेदी थांबवली आहे.