शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मारली दडी, बळीराजाची विस्कटली घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया ...

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून काहींनी पिकांचा पाटा पाडला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणी पेरणी करून आर्थिक झटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैमध्येही एकदाच असा फक्त साठ-सत्तर मिलीमीटर इतकाच पाऊस झाला. ऑगस्ट महिनापण कोरडा जात आहे. भर पावसाचा ऋतू हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.

पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहिवद, सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमा धारकांना संपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे या दुष्काळी गावातील सरपंच, उपसपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांत पावसाळ्यात पाऊसच झाला नाही, हा पहिलाच प्रसंग पहावयास मिळतो आहे. कितीतरी भयावह परिस्थिती झाली तरीही चाळीस-पन्नास टक्के हंगाम यायचा. चालूवर्षी पाऊसच झाला नाही. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. तीन महिन्यांचा पावसाळा संपत आला. पावसाळ्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असा बळीराजावरील कटू प्रसंग आमच्या साठ-सत्तर वय झाले तरी पाहिला नाही, अशा निराशाजनक प्रतिक्रिया बहुसंख्य वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कथन केल्या.