शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शासकीय कार्यालयांबाबत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST

बोदवड : शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ...

बोदवड : शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यात तालुक्यातील शासकीय कार्यालयांकडे अडकलेल्या कामांच्या तक्रारींचा अक्षरशः महापूर आला होता. त्यात सर्वाधिक तक्रारी या पाणीपुरवठा तसेच पंचायत समितीच्या होत्या.

पालकमंत्री आपल्या दारी या कार्यक्रमात ही बैठक शनिवारी झाली. ठिबक नळ्यांसाठी ८० टक्के अनुदानामध्ये बोदवड तालुक्याचा समावेश केला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच बोदवड तालुक्यासाठी ४० रोहित्र मंजूर करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेलवड, मानमोडी, कोल्हाडी या गावांच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी परस्पर काढण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. त्यावर सदर ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून वसुली करण्यात यावी, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

तसेच तालुक्यातील नगरपंचायतच्या समस्यांबाबत शहरातील ३२ विहिरी मंजूर आहे पण निधी मिळाला नसल्याचे तसेच शहरातील घरकुलाचे रखडलेले अनुदान शहरातील तलाव, तालुका क्रीडांगण, लिंगायत समाज स्मशानभूमी जागा, या समस्यांबाबतही पालकमंत्री पाटील यांनी सूचना दिल्या.

शिरसाळा मंदिरासाठी ४० लाख मंजूर

तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिरासाठी ४० लाख मंजूर करण्यात आले तसेच शिरसाळा गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. चिखली व कोल्हाडी गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज जोडणी व विहीरही मंजूर करण्यात आली.

सदर बैठकीला तहसीलदार, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी,गटविकास अधिकारी, वनक्षेत्रपाल, तालुका आरोग्य अधिकारी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, दीपक माळी, अमोल व्यवहारे, शांताराम कोळी, गोपाळ पाटील,काँग्रेसचे वीरेंद्रसिंग पाटील, सागर पाटील, नईम खान, डॉ. सुधीर पाटील, परेश अग्रवाल, आनंदा पाटील, आदी उपस्थित होते,

अग्निशमन बंबाचा निधी गेला परत

बोदवड शहराच्या अग्निशमन बंबासाठी ६० लाखाचा निधी दिला असून तो प्रस्ताव वेळेत न गेल्याने निधी परत गेल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोनवर समाचार घेतला.