शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

जळगाव : एमपीएससीची व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच २१ मार्च रोजी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे ...

जळगाव : एमपीएससीची व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच २१ मार्च रोजी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. परिणामी, यामुळे एका परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या वर्ग १ व २ च्या पदांसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र, या परीक्षेच्या दोन दिवस आधीच राज्य शासनाने कोरोनाचे कारण देत ही परीक्षा रद्द केली अन् चौथ्यांदा परीक्षा रद्द केली, म्हणून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली व त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. परिणामी, राज्य शासनाने लागलीच २१ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता एमपीएससी व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी आहे, त्यामुळे एका परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून जावे लागत असल्याचा, आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.

३२ हजार जागांसाठी रेल्वेची परीक्षा

रेल्वेची ३२ हजार २०८ जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. आधीच ही परीक्षा जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. मात्र, एका परीक्षेला संपूर्ण दिवस जात असल्यामुळे त्याच दिवशी दुसऱ्या परीक्षेला उपस्थिती देणे शक्य होत नाही. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा द्यावी की रेल्वेची, हा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.

केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना केंद्रांवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्राची निवड केली असल्यामुळे, एक ते दोन दिवस आधीच केंद्र असलेले शहर गाठणार आहेत. मात्र, परीक्षा वारंवार रद्द होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

सरकारने एमपीएससीची परीक्षा वेळेवर घेतली असती, तर विद्यार्थ्यांवर एका परीक्षेपासून मुकण्याची वेळ आली नसती. वर्षानुवर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. कुणीही एकाच परीक्षेवर अवलंबून राहत नाही, त्यामुळे विविध परीक्षांचा विद्यार्थी अभ्यास करतात. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एका परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. सरकार राजकारणात व्यस्त असून, त्यांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण वाढत चाललाय.

- कुणाल अत्तरदे

परीक्षा दोन दिवसांवर असताना एमपीएससीची परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर मग पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर केली. आता तर रेल्वेची व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आहे. कोणता पेपर द्यायचा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडणार आहे. ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोकरीवर याचा परिणाम होत आहे.

- अश्विनी कांबळे

एकाच परीक्षेवर कुणीही अवलंबून राहत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी करतात. जर एकाच दिवशी दोन पेपर असतील, तर विद्यार्थ्यांना दोनपैकी एका परीक्षेपासून मुकावे लागेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. त्यामुळे वांरवार परीक्षा रद्द होणे, एकाच दिवशी परीक्षा येणे यामुळे आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्याला सहन करावा लागतो.

- आशिष सोनार