शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंची गुणवत्ता शासन निर्णयाने झाकोळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. त्यात संबंधित विद्यार्थ्याने सहावी ते बारावी या काळात कधीही ते जिल्हा ते आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र २५ जानेवारी २०१९ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहावी आणि बारावीत विद्यार्थ्याने स्पर्धेत किमान सहभाग घ्यावा, अशी अट टाकण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तर प्राविण्य पाच गुण, विभागस्तर सहभाग पाच तर प्राविण्य १० गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग १५ आणि प्राविण्य २० तर राज्य स्तरावर प्राविण्य मिळवले तर १५ गुण मिळतात; मात्र यंदा वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे एकाही खेळाडूला गुण मिळतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आतापर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

खेळाडूंमध्ये नाराजी

यंदा लॉकडाऊनमुळे खेळाडू वर्षभरापासून घरातच आहेत, तसेच राज्यात शासनाची एकही आंतरशालेय स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे शासननियमानुसार एकाही खेळाडूला यंदा क्रीडा गुण मिळणार नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला असलेल्या खेळाडूंना क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. मागील चार ते सहा वर्षात त्यांनी कितीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या असल्या तरी यंदा त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाचे प्रयत्न सुरू

महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा संघटनेचे राजेश जाधव, डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून क्रीडा व युवक कल्याण विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.

२०१९-२० मध्ये आलेले प्रस्ताव

एकूण प्रस्ताव १६२२

दहावी - मुले ५५१

मुली ४३५

बारावी मुले- ४०४

मुली -२३२

२०२०-२१ मध्ये अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही.

कोट - नववी आणि अकरावीला असताना जे खेळले आहेत. जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले होते. त्यांना दहावी आणि बारावीला खेळले आहेत, असे गृहित धरून क्रीडा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा शिक्षक

कोट - खेळाडूंच्या हिताचा विचार करून शासनाने गुण द्यायला हवेत. त्यासाठी यंदा हे नियम शिथिल करावे. शासनाने खेळाडूंना गुण दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढेल - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक