शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

खेळाडूंची गुणवत्ता शासन निर्णयाने झाकोळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. त्यात संबंधित विद्यार्थ्याने सहावी ते बारावी या काळात कधीही ते जिल्हा ते आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र २५ जानेवारी २०१९ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहावी आणि बारावीत विद्यार्थ्याने स्पर्धेत किमान सहभाग घ्यावा, अशी अट टाकण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तर प्राविण्य पाच गुण, विभागस्तर सहभाग पाच तर प्राविण्य १० गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग १५ आणि प्राविण्य २० तर राज्य स्तरावर प्राविण्य मिळवले तर १५ गुण मिळतात; मात्र यंदा वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे एकाही खेळाडूला गुण मिळतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आतापर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

खेळाडूंमध्ये नाराजी

यंदा लॉकडाऊनमुळे खेळाडू वर्षभरापासून घरातच आहेत, तसेच राज्यात शासनाची एकही आंतरशालेय स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे शासननियमानुसार एकाही खेळाडूला यंदा क्रीडा गुण मिळणार नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला असलेल्या खेळाडूंना क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. मागील चार ते सहा वर्षात त्यांनी कितीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या असल्या तरी यंदा त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाचे प्रयत्न सुरू

महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा संघटनेचे राजेश जाधव, डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून क्रीडा व युवक कल्याण विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.

२०१९-२० मध्ये आलेले प्रस्ताव

एकूण प्रस्ताव १६२२

दहावी - मुले ५५१

मुली ४३५

बारावी मुले- ४०४

मुली -२३२

२०२०-२१ मध्ये अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही.

कोट - नववी आणि अकरावीला असताना जे खेळले आहेत. जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले होते. त्यांना दहावी आणि बारावीला खेळले आहेत, असे गृहित धरून क्रीडा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा शिक्षक

कोट - खेळाडूंच्या हिताचा विचार करून शासनाने गुण द्यायला हवेत. त्यासाठी यंदा हे नियम शिथिल करावे. शासनाने खेळाडूंना गुण दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढेल - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक