शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंची गुणवत्ता शासन निर्णयाने झाकोळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. त्यात संबंधित विद्यार्थ्याने सहावी ते बारावी या काळात कधीही ते जिल्हा ते आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र २५ जानेवारी २०१९ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहावी आणि बारावीत विद्यार्थ्याने स्पर्धेत किमान सहभाग घ्यावा, अशी अट टाकण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तर प्राविण्य पाच गुण, विभागस्तर सहभाग पाच तर प्राविण्य १० गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग १५ आणि प्राविण्य २० तर राज्य स्तरावर प्राविण्य मिळवले तर १५ गुण मिळतात; मात्र यंदा वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे एकाही खेळाडूला गुण मिळतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आतापर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

खेळाडूंमध्ये नाराजी

यंदा लॉकडाऊनमुळे खेळाडू वर्षभरापासून घरातच आहेत, तसेच राज्यात शासनाची एकही आंतरशालेय स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे शासननियमानुसार एकाही खेळाडूला यंदा क्रीडा गुण मिळणार नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला असलेल्या खेळाडूंना क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. मागील चार ते सहा वर्षात त्यांनी कितीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या असल्या तरी यंदा त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाचे प्रयत्न सुरू

महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा संघटनेचे राजेश जाधव, डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून क्रीडा व युवक कल्याण विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.

२०१९-२० मध्ये आलेले प्रस्ताव

एकूण प्रस्ताव १६२२

दहावी - मुले ५५१

मुली ४३५

बारावी मुले- ४०४

मुली -२३२

२०२०-२१ मध्ये अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही.

कोट - नववी आणि अकरावीला असताना जे खेळले आहेत. जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले होते. त्यांना दहावी आणि बारावीला खेळले आहेत, असे गृहित धरून क्रीडा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा शिक्षक

कोट - खेळाडूंच्या हिताचा विचार करून शासनाने गुण द्यायला हवेत. त्यासाठी यंदा हे नियम शिथिल करावे. शासनाने खेळाडूंना गुण दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढेल - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक