शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

खेळाडूंची गुणवत्ता शासन निर्णयाने झाकोळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. त्यात संबंधित विद्यार्थ्याने सहावी ते बारावी या काळात कधीही ते जिल्हा ते आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र २५ जानेवारी २०१९ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहावी आणि बारावीत विद्यार्थ्याने स्पर्धेत किमान सहभाग घ्यावा, अशी अट टाकण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तर प्राविण्य पाच गुण, विभागस्तर सहभाग पाच तर प्राविण्य १० गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग १५ आणि प्राविण्य २० तर राज्य स्तरावर प्राविण्य मिळवले तर १५ गुण मिळतात; मात्र यंदा वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे एकाही खेळाडूला गुण मिळतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आतापर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

खेळाडूंमध्ये नाराजी

यंदा लॉकडाऊनमुळे खेळाडू वर्षभरापासून घरातच आहेत, तसेच राज्यात शासनाची एकही आंतरशालेय स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे शासननियमानुसार एकाही खेळाडूला यंदा क्रीडा गुण मिळणार नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला असलेल्या खेळाडूंना क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. मागील चार ते सहा वर्षात त्यांनी कितीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या असल्या तरी यंदा त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाचे प्रयत्न सुरू

महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा संघटनेचे राजेश जाधव, डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून क्रीडा व युवक कल्याण विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.

२०१९-२० मध्ये आलेले प्रस्ताव

एकूण प्रस्ताव १६२२

दहावी - मुले ५५१

मुली ४३५

बारावी मुले- ४०४

मुली -२३२

२०२०-२१ मध्ये अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही.

कोट - नववी आणि अकरावीला असताना जे खेळले आहेत. जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले होते. त्यांना दहावी आणि बारावीला खेळले आहेत, असे गृहित धरून क्रीडा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा शिक्षक

कोट - खेळाडूंच्या हिताचा विचार करून शासनाने गुण द्यायला हवेत. त्यासाठी यंदा हे नियम शिथिल करावे. शासनाने खेळाडूंना गुण दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढेल - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक