शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असल्याच्या तक्रारी याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमवारी देखील अनेक रुग्णांनी या ठिकाणच्या जेवणाचा दर्जा बाबत तक्रारी करत अनेकांना जेवणच दिले जात नसल्याचा आरोप काही रुग्णांनी केला आहे.

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही नागरिकांना जेवण, नाश्ता उपलब्ध होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते अशा तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्याच तक्रारी येत असल्याने सोमवारी दुपारी नगरसेवक कैलास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे यांच्यासह जाऊन पाहणी केली. कोविड रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कैलास सोनवणे यांनी लागलीच महापौरांशी याबाबत संवाद साधला. तसेच मनपा अधिकारी शुक्ला व नाष्ट्ये यांना बोलावून घेतले.

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा भांडारपालला विचारणा केली असता जेवणाचा मक्ता पूजा केटरर्सला दिला असून प्रति व्यक्ती प्रति दिवस १४० रुपये प्रमाणे खर्च दिला जातो. मक्तेदाराने दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता आणि फळे देण्याचे त्यात नमूद असल्याची माहिती त्याने दिली. फळे केवळ केळी द्यावी का? जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी का? पार पाडली जात नाही याबाबत नगरसेवक सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच नागरिकांची तक्रार लेखी घेऊन मनपा आयुक्तांना कळवावे, असेही सोनवणे यांनी सांगितले.

३०० रुग्ण असताना ही जेवण बेचव

मनपाचा कोविड केअर सेंटर मध्ये सद्यस्थितीत ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल १४०० हून अधिक बेड खाली आहेत. मात्र अशा परिस्थितीतदेखील या ठिकाणच्या रुग्णांना व्यवस्थित जेवण दिले जात नसल्याने अनेक रुग्ण आता गृह विलगीकरणाचे मागणी करत आहेत. महापालिका प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यानेच अनेक रुग्ण घरीच जाऊन उपचार घेणे पसंत करत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.