शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जळगाव जिल्ह्यात पंधरा लाख गाठींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पन्न घटले: यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे कापसाच्या ...

अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पन्न घटले: यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाल्याने, जिल्ह्यात १५ लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे कापसाची खरेदी होऊ शकली नव्हती. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच जिल्ह्यातील ९० टक्के कापसाची शासकीय शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी झालेली होती.

जिल्ह्यात कापसाला सर्वाधिक भाव ६,५०० प्रति क्विंटल इतका भाव एप्रिल महिन्यात मिळाला, तर सर्वात कमी भाव पाच हजार प्रति क्विंटल इतका भावही कमी दर्जाच्या कापसाला मिळाला होता. मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंटचे दर वाढल्याने कापसाच्या दरातही चांगली वाढ झाली होती. दरम्यान, पुढील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची मागणी जास्त राहण्याची शक्यता कॉटन क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात यंदाही पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव कमी राहण्याची शक्यता असून, पावसाची स्थिती चांगली राहिल्यास, या वर्षी विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. या वर्षी ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे.