शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खान्देशात १० लाख कापूस गाठींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

वर्ष - उद्दिष्ट - खरेदी २०१५-१६ - १५ लाख - १५ लाख ५० हजार गाठी २०१६-१७ - १५ ...

वर्ष - उद्दिष्ट - खरेदी

२०१५-१६ - १५ लाख - १५ लाख ५० हजार गाठी

२०१६-१७ - १५ लाख - १४ लाख ३४ हजार

२०१७-१८ - १५ लाख - १४ लाख ६० हजार

२०१८-१९ - १५ लाख - १४ लाख २५ हजार

२०१९-२० - १५ लाख - १३ लाख ७० हजार (कोरोना)

२०२०-२१ - १५ लाख - १० लाख - (जानेवारी अखेरपर्यंत)

खान्देशातील लागवड

२०१६ - ७ लाख ५० हजार हेक्टर

२०१७ - ७ लाख ९० हजार हेक्टर

२०१८ - ७ लाख २० हजार

२०१९ - ८ लाख २४ हजार

२०२० - ९ लाख २५ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - यंदा खान्देशात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. त्यामुळे उत्पादन देखील १६ लाख गाठींपर्यंत जाईल असा अंदाज कॉटन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र, यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, आतापर्यंत खान्देशात १० लाख गाठींची खरेदी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत खरेदी होणाऱ्या कापसाच्या प्रमाणात यंदाचे प्रमाण हे २ ते ३ लाख गाठींनी कमी आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत खान्देशात १२ ते १३ लाख गाठींची खरेदी होत असते, यंदा मात्र १० लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

खान्देशात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही लागवड जास्त होती. त्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज कापूस बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे यंदाचे उद्दिष्ट १६ लाख गाठींचे ठेवण्यात आले. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सीसीआय, पणन या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हे उद्दिष्ट सहज होईल, असे चित्र होते. मात्र, १४ जानेवारीनंतर कापसाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी अक्षर: पाठ फिरवली. आता खासगी जिनिंग असो वा शासकीय खरेदी केंद्र ओस पडलेले दिसून येत आहेत.

केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक

शेतकऱ्यांनी माल थांबविला असण्याची शक्यता कमीच असून, केवळ मोठ्या शेतकऱ्यांनी भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केलेला नाही. ८५ ते ९० टक्के शेतकऱ्यांचा कापूस विक्री होऊन गेला आहे. त्यामुळे मालाची आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. तसेच गेल्यावर्षी कोरोनामुळे खरेदीदेखील लांबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा भावाची वाट न पाहता, थेट विक्री केली.

शासकीय खरेदी बंद, खासगी जिनिंंगवर शुकशुकाट

मकर संक्रांतनंतर मालाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २९ जानेवारीपासून सीसीआयने खरेदी थांबविली आहे. तर खासगी जिनिंगमध्येदेखील भाव वाढल्याने काही दिवस शेतकऱ्यांचा रांगा लागल्या होत्या. मात्र, सद्य:स्थितीत खासगी जिनिंगवरदेखील शुकशुकाट पाहायला मिळत असून, ठरावीकच शेतकरी आपला माल घेऊन येत आहेत.

कापसाच्या उत्पादनात घट होण्याची कारणे

१.यंदा जरी मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तरी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २५ टक्के कापसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

२. सप्टेंबर महिन्यातच बऱ्याच भागात कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला आलेला माल काढून विक्री केला. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फरदडचा माल घेतला जातो. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतातून कापूस काढून टाकला व रब्बीची तयारी केली. यामुळे यंदा क्षेत्र मोठे असूनही उत्पादनात वाढ झालेली नाही.

कोट..

यंदाच्या कापूस खरेदीचे अंदाज चुकले आहेत, सुरुवातीला शेतकऱ्यांची गर्दी पाहता यंदा उत्पादन वाढेल, अशी शक्यता होती. मात्र, अतिवृष्टी, बोंडअळीमुळे जवळपास उत्पादनावर मोठा परिणाम केला आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांनीच आपला माल विक्री केलेला नाही.

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन