शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरु, २५ शेतकऱ्यांना कारवाईचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2023 14:45 IST

हातगाव, म्हसवे, अंजनी क्षेत्रात भरारी पथकांच्या धाडी

कुंदन पाटील, जळगाव : यंदा पावसाअभावी विहिरीतील जलसाठ्याने तळ गाठले आहे. तशातच  ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात पिकांची स्थिती नाजूक होत असताना गिरणासह अन्य जलप्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा सुरु केला आहे. भविष्यात टंचाईचे टचके बसणार असल्याची दाट शक्यता असताना आरक्षित पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ४ ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे.

चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र विहिरीतील जलसाठा आटल्याने अनेकांनी धरण, तलावकाठी विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागासह अन्य यंत्रणांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.

१० मोटारी जप्त

हातगाव (चाळीसगाव) व म्हसवे (पारोळा) या दोन्हीठिकाणाहून १० विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर अंजनी (एरंडोल) धरणाच्या बॅकवॉटरमधून पाण्याचा उपसा करणाऱ्या १२ विद्युत मोटारी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना ताकीद देऊन या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. देवळी-भोरस (चाळीसगाव) भागातही शेतकऱ्यांना मोटारी उचलण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.

पथकांकडून तपासणी

गिरणा पाटबंधारे विभागाचे स्थानिक शाखाधिकारी, कॅनाल निरीक्षक, स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, महसुल विभागाचा प्रतिनिधीचा समावेश असलेले पथके प्रकल्पातील जलसाठ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी वीज कंपनीचे प्रतिनिधी वेळीच दाखल होत नसल्याने कारवाईत अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाने वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.त्यानुसार तांत्रिक कारवाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा प्रकल्पांमधील जलसाठा पुरेसा नाही. म्हणून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सार्वजनिक हित लक्षात घेत सिंचनासाठी पाण्याची उचल करु नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र