शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरु, २५ शेतकऱ्यांना कारवाईचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2023 14:45 IST

हातगाव, म्हसवे, अंजनी क्षेत्रात भरारी पथकांच्या धाडी

कुंदन पाटील, जळगाव : यंदा पावसाअभावी विहिरीतील जलसाठ्याने तळ गाठले आहे. तशातच  ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात पिकांची स्थिती नाजूक होत असताना गिरणासह अन्य जलप्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा सुरु केला आहे. भविष्यात टंचाईचे टचके बसणार असल्याची दाट शक्यता असताना आरक्षित पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ४ ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे.

चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र विहिरीतील जलसाठा आटल्याने अनेकांनी धरण, तलावकाठी विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागासह अन्य यंत्रणांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.

१० मोटारी जप्त

हातगाव (चाळीसगाव) व म्हसवे (पारोळा) या दोन्हीठिकाणाहून १० विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर अंजनी (एरंडोल) धरणाच्या बॅकवॉटरमधून पाण्याचा उपसा करणाऱ्या १२ विद्युत मोटारी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना ताकीद देऊन या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. देवळी-भोरस (चाळीसगाव) भागातही शेतकऱ्यांना मोटारी उचलण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.

पथकांकडून तपासणी

गिरणा पाटबंधारे विभागाचे स्थानिक शाखाधिकारी, कॅनाल निरीक्षक, स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, महसुल विभागाचा प्रतिनिधीचा समावेश असलेले पथके प्रकल्पातील जलसाठ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी वीज कंपनीचे प्रतिनिधी वेळीच दाखल होत नसल्याने कारवाईत अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाने वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.त्यानुसार तांत्रिक कारवाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा प्रकल्पांमधील जलसाठा पुरेसा नाही. म्हणून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सार्वजनिक हित लक्षात घेत सिंचनासाठी पाण्याची उचल करु नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र