शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आयात बंदी पूर्णत: हटविल्याने कडधान्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

जळगाव : केंद्र सरकारने कडधान्यावरील आयात बंदी पूर्णत: हटविल्यामुळे विदेशातून कडधान्याची आवक वाढत असून स्थानिक कडधान्याचे दर हमीभावापेक्षाही खाली ...

जळगाव : केंद्र सरकारने कडधान्यावरील आयात बंदी पूर्णत: हटविल्यामुळे विदेशातून कडधान्याची आवक वाढत असून स्थानिक कडधान्याचे दर हमीभावापेक्षाही खाली आले आहेत. हा निर्णय होऊन आठवडादेखील झाला नाही तोच उदीड, मूग, तूर यांच्या भावात दीड ते दोन हजार तर हरभऱ्यात ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडण्यासह हमीभावापेक्षाही कमी दरात माल खरेदी केल्यास व्यापारीदेखील अडचणीत येणार आहे. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आयात बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

कडधान्याच्या आयातीला चार वर्षांपासून मर्यादित प्रमाणात परवानगी होती. मात्र, केंद्र सरकारने आता आयातीला पूर्णत: परवानगी दिली आहे. विदेशातून आवक वाढल्याने बाजार समितीमध्ये स्थानिक पातळीवरून येणाऱ्या कडधान्याच्या भावात घसरण झाली व कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली घसरले आहेत. यात हमीभावापेक्षा कमी किमतीत माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या भीतीमुळे व्यापारीही धास्तावले आहेत.

आठवडाभरात मोठी घसरण

आयात बंदीच्या निर्णयाने आठवडाभरात भावात मोठी घसरण झाली आहे. यामध्ये उडदासाठी सहा हजार हमी भाव असून आयात बंदी उठविण्याआधी त्याला ६५०० ते ७८०० रुपये भाव मिळत होता. आता हाच भाव पाच हजार ते सहा हजारांवर आला आहे. अशाच प्रकारे मुगाचा हमी भाव ७१९६ असून आयात बंदी उठविण्याआधी त्याला ७००० ते ७५०० रुपये भाव मिळत होता. आता हाच भाव चार हजार ते सहा हजारावर आला आहे. तुरीचा हमी भाव ६००० असून पूर्वी तिला ६५०० ते ७२०० रुपये मिळणारा भाव आता ५५०० ते ५८०० वर आला आहे. तर हरभऱ्याचा हमी भाव ५१०० असून पूर्वी त्याला ५१०० ते ५४०० रुपये भाव मिळत होता. आता तो ४६०० रुपयांवर आला आहे.

कडधान्याच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता

आता खरीप हंगाम तोंडावर आला असून जून महिन्यात पेरणी होईल. त्यात आता खरीप हंगामाच्या तोंडावरच कडधान्याचे भाव घसरल्याने यंदा शेतकरी कडधान्याची पेरणी करताना विचार करेल व त्याचा परिणाम पेरणीवर होऊन कडधान्याचे उत्पादन कमी होऊन साहजिकच डाळीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच कडधान्याबाबत परदेशांवर अवलंबून राहावे लागेल. त्यानंतर भाव वाढल्यास सर्वसामान्य जनतेला त्याची झळ सहन करावी लागेल. त्यामुळे केंद्र शासनाने आताच कडधान्य आयात बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक राठी व अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी केली आहे.

दाल मिल व्यवसायावर मोठा परिणाम

केंद्र शासनाच्या चुकीच्या व धरसोड धोरणामुळे कडधान्य, डाळ व्यवसायावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होईल. त्यामुळे जळगावसह देशातील दाल मिल व्यवसाय भविष्यात आणखीच डळमळीत होऊ शकतो, असाही धोका आहे. केंद्र सरकारने कडधान्य आयात बंदीचा निर्णय त्वरित घ्यावा आणि आगामी काळातील दुष्परिणाम टाळावा, अशी मागणीदेखील संघटनेने केली आहे.

निविदानंतर आयातीला परवानगी

मागील चार वर्षांपासून केंद्र सरकार कडधान्य आयातीला मर्यादित स्वरूपात परवानगी देत होते. यामध्ये विदेशातून उडीद साडेपाच लाख टन, तूर चार लाख टन, मूग दीड लाख टन आयात होत होते. आता या निर्णयाने कितीही आयात होऊ शकेल. आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारच्या डीजीएफटी या संस्थेकडे व्यापाऱ्यांना आयात मालासाठी निविदा भरावी लागत होती. त्यानुसार यंदाही या निविदा मागितल्या होत्या. त्यासाठी लागणारे शासकीय शुल्कही शासनाने घेतले. मात्र, शासनाने शुल्क घेतल्यानंतरही त्या निविदांवर कोणताही निर्णय न घेता पूर्ण आयातीला परवानगी दिली आहे, हे एक गौडबंगालच असल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत असोसिएशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात येऊन आयात बंदीची मागणी केली आहे.