शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

खड्डेमुक्तीत सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अडचणींचा डोंगर: जिल्हा व इतर मार्गाचे ३५ टक्केच काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:04 IST

बांधकाम विभागाच्या सूत्रांची माहिती: राज्य मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण

ठळक मुद्दे जि.प.कडून वर्ग १५०० किमी रस्त्यांची अवस्था खड्डे बुजण्याच्याही पलिकडची ३१ डिसेंबर ही खड्डे मुक्तची डेडलाईन जाहीर केली असली तरीही १५ डिसेंबरच डेडलाईन समजून काम सुरू तीन विभाग मिळून केवळ १०५ टेंडर

जळगाव: राज्यातील रस्ते ३१ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याच्या मोहीमेंतर्गत जिल्ह्यात बांधकाम विभागातर्फे जोरदार प्रयत्न सुरू असले तरीही राज्य मार्गाचे ८० टक्के तर जिल्हा व इतर मार्गांच्या दुरुस्तीचे केवळ ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. तर जि.प.कडून वर्ग झालेल्या १५०० किमी रस्त्यांची अवस्था खड्डे बुजण्याच्याही पलिकडची असल्याने वेळेत उद्दीष्ट पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. मात्र वेळेत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे.खड्डे दुरुस्तीत जळगाव राज्यात पहिल्या पाच मध्येअधीक्षक अभियंता सोनवणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील १९०० किमीच्या राष्टÑीय व राज्य महामार्गावरील खड्डे बुजायचे आहेत.  ९ नोव्हेंबर पर्यंत त्यापैकी ३५ टक्के काम पूर्ण झाले होते. त्यातील राज्य मार्गाच्या ७८० किमी लांबीपैकी ६२८ किमीवरील खड्डे भरण्याचे  म्हणजेच ८० टक्के काम सोमवार दि.२० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.  तसेच जिल्हा व इतर मार्गाच्या (एमबीआर) सुमारे १०५८ किमी लांबीच्या रस्तांवरील खड्डे बुजवायचे होते. आजअखेर त्यापैकी ३७६ किमी म्हणजेच ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.३१ डिसेंबर ही खड्डे मुक्तची डेडलाईन जाहीर केली असली तरीही १५ डिसेंबरच डेडलाईन समजून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.जि.प.कडील रस्त्यांची अडचणजिल्हा परिषदेकडून सुमारे १५०० किमी लांबीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दर्जोन्नती होऊन वर्ग झाले आहेत. मात्र या रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, खड्डे बुजण्याऐवजी पूर्ण रस्त्याचीच दुरूस्ती करावी लागेल. त्यामुळे बांधकाम विभागासमोर अडचण निर्माण झाली आहे. तरीही यावर मार्ग काढून १५ डिसेंबरपर्यंत या रस्त्यांची डागडुजीचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.पावसामुळे व्यत्ययरविवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. ओलसरपणा असल्यास डांबर पक्के राहत नाही. त्यामुळे दोन-चार दिवस या कामात विलंब होणार आहे. दरम्यान जिल्हाभरात रस्ता दुरुस्तीसाठी ११८ युनिट काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.तीन विभाग मिळून केवळ १०५ टेंडरपूर्वी अर्धा ते १ किमी लांबीचे खड्डे दुरुस्तीचे टेंडर काढले जात होते. मात्र आता सरकारने यात बदल करून  १० किमीच्या खाली असे टेंडर काढता येणार नाही, असा नियम केला. त्यामुळे २०-२५ किमी लांबीच्या कामांचेच टेंडर काढले जात आहेत. पूर्वी २-३ किमी लांबीचे देखील टेंडर निघत असल्याने सुमारे १००० ते २००० छोटे टेंडर निघत असत. मात्र आता तिनही विभाग मिळून केवळ १०५ टेंडर निघाले असल्याचे सांगितले.