शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘समतोल’च्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:54 IST

-सपना श्रीवास्तव

घरातून कुठल्याही कारणाने अथवा रागाने घर सोडलेल्या मुलांसाठी ‘समतोल प्रकल्प’ आधारवड ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी ‘समतोल’ने जळगाव व भुसावळ स्टेशनवर कामाला सुरुवात केली असून, आजतागयत तब्बल १२३२ बालकांना सुखरुप त्यांच्या घरी सोपविले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील मुलांना, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन करुन घराकडे पाठविले आहे.समाजात दातृत्व निर्माण व्हावे, या भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘आईसारखे समाजावर नि:स्वार्थ प्रेम करुया’ या मातृत्व भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानने आॅक्टोबर २०१५ पासून ‘समतोल प्रकल्प’ राबविण्यास सुरु केली आहे. कुठल्यातरी कारणाने घरातून पळून गेलेल्या किंवा रागाच्या भरात घर सोडलेल्या बालकांचे बालपण गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नये, या करिता अशा मुलांचे समतोलच्या माध्यमातुन समुपदेशन करुन त्यांना सुखरुप घरी पोहचविण्याचे काम या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातुन केले जात आहेत. मुंबई येथील समतोल फाऊंडेशनतर्फे २००४ पासून रेल्वे स्टेशन मुंबई विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुुरु आहे. या उपक्रमाच्या कार्याबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीबद्दल देण्यात येणारा डॉ. अविनाशी सेवा पुरस्काराने २०१३ मध्ये या संस्थेचा सन्मान करण्यात आला होता. या संस्थेच्या कार्याची दखल घेत, केशवस्मृती प्रतिष्ठानने जळगाव व भुसावळ स्टेशनवर समतोल प्रकल्प सुरु करण्याचा निश्चय केला . याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून शोषित आणि पीडितासांठी काम करणाऱ्या सपना श्रीवास्तव यांच्याकडे सोपविली आहे. श्रीवास्तव व त्यांच्या टीमने हा उपक्रम सुुरु करण्यासाठी जळगाव व भुसावळ स्टेशनवर सर्वेक्षण केले असता, चार दिवसांत त्यांना तब्बल २०० बालके आढळून आली. समतोलने तीन वर्षांपासून हा उपक्रम सुुरु केल्यापासून भंगार वेचणारे, नशा करणारे, चोरी करणारे अशा पद्धतीने गुन्हेगारी जगताकडे वळण घेणाऱ्या हजारो मुलांचे समुपदेशन करुन,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.-सपना श्रीवास्तवसमतोल प्रकल्प, जळगाव.