शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘समतोल’च्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:54 IST

-सपना श्रीवास्तव

घरातून कुठल्याही कारणाने अथवा रागाने घर सोडलेल्या मुलांसाठी ‘समतोल प्रकल्प’ आधारवड ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी ‘समतोल’ने जळगाव व भुसावळ स्टेशनवर कामाला सुरुवात केली असून, आजतागयत तब्बल १२३२ बालकांना सुखरुप त्यांच्या घरी सोपविले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील मुलांना, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन करुन घराकडे पाठविले आहे.समाजात दातृत्व निर्माण व्हावे, या भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘आईसारखे समाजावर नि:स्वार्थ प्रेम करुया’ या मातृत्व भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानने आॅक्टोबर २०१५ पासून ‘समतोल प्रकल्प’ राबविण्यास सुरु केली आहे. कुठल्यातरी कारणाने घरातून पळून गेलेल्या किंवा रागाच्या भरात घर सोडलेल्या बालकांचे बालपण गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नये, या करिता अशा मुलांचे समतोलच्या माध्यमातुन समुपदेशन करुन त्यांना सुखरुप घरी पोहचविण्याचे काम या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातुन केले जात आहेत. मुंबई येथील समतोल फाऊंडेशनतर्फे २००४ पासून रेल्वे स्टेशन मुंबई विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुुरु आहे. या उपक्रमाच्या कार्याबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीबद्दल देण्यात येणारा डॉ. अविनाशी सेवा पुरस्काराने २०१३ मध्ये या संस्थेचा सन्मान करण्यात आला होता. या संस्थेच्या कार्याची दखल घेत, केशवस्मृती प्रतिष्ठानने जळगाव व भुसावळ स्टेशनवर समतोल प्रकल्प सुरु करण्याचा निश्चय केला . याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून शोषित आणि पीडितासांठी काम करणाऱ्या सपना श्रीवास्तव यांच्याकडे सोपविली आहे. श्रीवास्तव व त्यांच्या टीमने हा उपक्रम सुुरु करण्यासाठी जळगाव व भुसावळ स्टेशनवर सर्वेक्षण केले असता, चार दिवसांत त्यांना तब्बल २०० बालके आढळून आली. समतोलने तीन वर्षांपासून हा उपक्रम सुुरु केल्यापासून भंगार वेचणारे, नशा करणारे, चोरी करणारे अशा पद्धतीने गुन्हेगारी जगताकडे वळण घेणाऱ्या हजारो मुलांचे समुपदेशन करुन,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.-सपना श्रीवास्तवसमतोल प्रकल्प, जळगाव.