शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

टंचाई निवारणार्थ दोन कोटींच्यावर तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणी टंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणी टंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात होऊ शकली. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र या खर्चात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अवघ्या १३ लाख ९० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. पाऊस उत्तम झाल्याने आराखडा कमी रकमेचा तयार होत आहे.

जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस होऊन पावसाने सरासरी ओलांडली. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे नद्या, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नद्या, तलावांना पाणी असल्याने टंचाई आराखड्यातील तरतूद घटू शकली.

४१७ योजनांद्वारे टंचाई निवारण

जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका, प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोलीकरण, अशा १५ तालुक्यांमध्ये एकूण ४१७ योजनांद्वारे दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपये खर्च करून टंचाई निवारण केले जाणार आहे.

सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात

टंचाई निवारणासाठी सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात राबविल्या जाणार आहेत. येथे ४० लाख वीस हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ७८ योजनांद्वारे ३० लाख ७० हजार, तर धरणगाव तालुक्यात ६८ योजनांद्वारे ३१ लाख २० हजार रुपये खर्च करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जाणार आहेत.

गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा १३ लाख ९० हजारांचा होता, तर २०१९ मध्ये हाच आराखडा ३६ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जिल्ह्यात उत्तम पाऊस झाल्याने आराखड्यातील तरतुदींचा खर्च कमी होऊ शकला.

तालुकानिहाय योजनांची संख्या व खर्च (खर्च लाखामध्ये)

तालुका--- योजना संख्या--- खर्च

अमळनेर--- ८०---४०.२०

भडगाव---८---१.९२

भुसावळ---४---११.०८

बोदवड---१५---७.७६

चाळीसगाव ---४५---१९.८०

चोपडा ---२४---१३.१२

धरणगाव---६८---३१.२०

एरंडोल---७---२.५२

जळगाव---१७---९.२८

जामनेर---१६---५.७६

मुक्ताईनगर ---१७---९.२०

पाचोरा ---२५---११.४०

पारोळा ---७८---३०.७०

रावेर ---५---२.९२

यावल---८---६.३२