शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने चालणा-या विकास महामंडळाला त्वरित महाराष्ट्र व केंद्र सरकारने निधी द्यावे आणि ...

जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने चालणा-या विकास महामंडळाला त्वरित महाराष्ट्र व केंद्र सरकारने निधी द्यावे आणि कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आघाडी सरकार येऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी होत असताना मातंग समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक मदत न देता उलट केंद्र सरकारमधील सामाजिक न्याय विभागातून एनएसएफडीसी केंद्र शासनाच्या संस्थेने राज्य शासनाच्या या महामंडळावर दावा ठोकला आहे. शंभर कोटी कर्ज म्हणून काही वर्षांपूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला दिले होते व ते कर्ज मातंग समाजाच्या नावाने वितरण करण्यात आले. काही घटनांमुळे महामंडळ हे डबघाईला आले आहे. दुसरीकडे व्यवस्थापकीय संचालक यांची खुर्ची ही जप्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एनएसएफडीसी संस्थेने शंभर कोटी कर्ज भरण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाला आदेश द्यावेत, अन्यथा समाजावर मोठा अन्याय होईल, असे निवदेनात म्हटले आहे. निवेदनावर नामदेव मोरे, अनिल पगारे, अरुण खरात, रमेश कांबळे, जगन पगारे, शुद्धोधन भोळे, रोहिदास पगारे यांच्या स्वाक्षरी आहेत.