शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या ...

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष

जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून करण्यात येत आहे. यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला प्रथमच मतदान करण्याची संधी मिळाली व ते आपण केले याचा अभिमान वाटतो, अशा भावना नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच प्रबोधन करणारी उपक्रम राबविले जातात. विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो.

प्रशासकीय पातळीवर असे उपक्रम राबविले जात असले तरी प्रत्येक नागरिकाचे सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे हे कर्तव्य आहे, या भावनेतून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून केले जात आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. या प्रमाणेच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना निर्माण होण्याची गरज असल्याचे मत वडली येथील प्रियंका रमेश पवार या प्रथमच मतदान केलेल्या तरुणीने व्यक्त केले.

मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस असून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे, असे मत ममुराबाद येथील दिग्विजय शरद पाटील या प्रथमच मतदान केलेल्या तरुणाने व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले याचा अभिमान वाटतो. प्रत्येकाना आपला हा हक्क बजावलाच पाहिजे. गावाच्या विकासासाठी विकासाभिमुख उमेदवाराला यातून निवडता येते.

- प्रियंका रमेश पवार, नवमतदार.

मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

- दिग्विजय शरद पाटील, नवमतदार.