शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या ...

राष्ट्रीय मतदार दिवस विशेष

जळगाव : मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून करण्यात येत आहे. यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला प्रथमच मतदान करण्याची संधी मिळाली व ते आपण केले याचा अभिमान वाटतो, अशा भावना नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच प्रबोधन करणारी उपक्रम राबविले जातात. विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो.

प्रशासकीय पातळीवर असे उपक्रम राबविले जात असले तरी प्रत्येक नागरिकाचे सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे हे कर्तव्य आहे, या भावनेतून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन नवमतदारांकडून केले जात आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. या प्रमाणेच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना निर्माण होण्याची गरज असल्याचे मत वडली येथील प्रियंका रमेश पवार या प्रथमच मतदान केलेल्या तरुणीने व्यक्त केले.

मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस असून थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे, असे मत ममुराबाद येथील दिग्विजय शरद पाटील या प्रथमच मतदान केलेल्या तरुणाने व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले याचा अभिमान वाटतो. प्रत्येकाना आपला हा हक्क बजावलाच पाहिजे. गावाच्या विकासासाठी विकासाभिमुख उमेदवाराला यातून निवडता येते.

- प्रियंका रमेश पवार, नवमतदार.

मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टीने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

- दिग्विजय शरद पाटील, नवमतदार.