शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष, संघटनांची केंद्र सरकार विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून संयुक्त किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंद पुकारला होता. या भारत बंदमध्ये जळगाव शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आंदोलन केले. तसेच विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र त्याव्यतिरिक्त शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते.

जळगाव शहरात संयुक्त किसान मोर्चाने मणियार बिरादरी आणि लोकसंघर्ष मोर्चाने या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. त्यात उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, डॉ.रियाज खाटीक, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.

या भारत बंदला मनपाच्या गाळेधारकांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, युवक अध्यक्ष रविंद्र पाटील, सलीम इनामदार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात घोषणा देण्यात आली. वाढती महागाई, कृषी कायदे, कामगार विरोधी धोरण याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.

काँग्रेसचे उपोषण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत काँग्रेस भवनातच उपोषण केले. त्यासोबतच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आले. त्यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मंगला पाटील, वाल्मिक पाटील, शशी तायडे, योगिता शुक्ला, छाया कोरडे आणि इतर उपस्थित होते.

ऑल इंडिया ट्रेड युनियन

तिन कृषी कायद्याविरोधात भारत बंद पुकारण्यात आला. त्यावेळी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात सरकारने हे कायदे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यात कॉ. अमृतराव महाजन, राजेंद्र झा, जे.एन. बाविस्कर यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे.

बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचे तसेच धान्य मार्केटमध्ये व्यवहार दिवसभर सुरळीत होते. त्यासोबतच शहरातील बाजारपेठेत देखील नियमीत खरेदीविक्री सुरू होती. त्यावर बंदचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. गाळेधारकांनीही आजच बंद पुकारलेला असल्याने बाजारपेठेच्या काही भागात शुकशुकाट होता.

कोट - भाजपने मिळालेल्या बहुमताचा दुरूपयोग करून भांडवलशाहीसाठी फायद्याचे कायदे केले आहेत. त्यात कृषी विधेयकांचा समावेश आहे. त्या बिलाच्या निषेधार्ह १२० दिवसांपासून शेतकरी उपोषण करताहेत. इंधन दराला आळा घालण्यासाठी आज काँग्रेसने निर्दशने करत आहोत. - डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस