शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जि.प.च्या ५०० शाळांना संरक्षण भिंती उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

पाळधी (ता. धरणगाव) : जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव तालुक्यात घेण्यात आला आहे. राज्य ...

पाळधी (ता. धरणगाव) : जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव तालुक्यात घेण्यात आला आहे. राज्य पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५००पेक्षा अधिक शाळांना १४ व्या वित्त आयोगातून संरक्षक भिंती बांधण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केली.

पाळधी खुर्द गावातील फुलेनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली. त्याचे लोकार्पण शनिवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भिंतीचे काम मनरेगा, जिल्हा नियोजन समिती आणि चौदावा वित्त आयोग योजनेंतर्गत केले गेले. यासाठी १० लक्ष ४७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी शाळेच्या आवारात गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक शरद पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले, तर केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजू पाटील, दिलीप पाटील, दामू पाटील, संजय पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सरपंच चंद्रकांत माळी, प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी पाठक, मुख्याध्यापक शरद पाटील, सचिन सरकटे, अरविंद मानकरी, संदीप पवार, नाना पाटील, बापू मोरे उपस्थित होते.