शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांचे १५ जुलैपर्यंत मागविले प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

जळगाव : जून, जुलै, ऑगस्ट महिन्यातील परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आई अथवा वडील किंवा दोघेही पालक गमावले ...

जळगाव : जून, जुलै, ऑगस्ट महिन्यातील परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आई अथवा वडील किंवा दोघेही पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतला असून १५ जुलै पर्यंत महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

काही विद्यार्थी संघटनांनी या बाबतीत विद्यापीठाला निवेदन दिले होते. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठविण्यात आले आहे. या परिपत्रकात महाविद्यालये, परिसंस्था, प्रशाळांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आई अथवा वडील किंवा दोघेही कोरोनामुळे मृत्युमुखी पडले असतील त्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव घ्यावेत. ज्या बँक खात्यात परीक्षा शुल्क जमा करावयाचे आहे. त्या बँकेचे नाव व खाते क्रमांक, आई, वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क भरल्याची पावती अशी माहिती १५ जुलै पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडे सादर करावयाची आहे असे या परिपत्रकात नमूद केले आहे.