शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या कामाला अडथळा ठरणारा विद्युत खांब हटवण्याचा ठराव फेब्रुवारी महिन्यात होऊन देखील मनपा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तब्बल तीन महिने उशिराने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याने या पुलाच्या कामाला उशीर होत आहे.

१८ महिन्यांत या पुलाचे काम होणे अपेक्षित असताना, आता २६ महिने होऊन देखील पुलाचे काम अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. पुलाच्या कामाला पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत आहेत. हे विद्युत खांब काढण्याचे काम महावितरणकडे देण्यात आले होते. मात्र, महावितरणकडे निधी नसल्याने हे काम रखडले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने पुलाच्या कामाला होणाऱ्या उशीरामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री निधी अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांपैकी शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला.

ठराव झाला फेब्रुवारीत, प्रस्ताव पाठविला ३० एप्रिलला

विद्युत खांब मनपाच्यावतीने काढून घेण्याचा ठराव ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत मंजूर करून घेण्यात आला. या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झाल्यानंतर तत्काळ पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, तब्बल तीन महिने हा ठराव मनपा आयुक्तांकडे पडून होता. तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे ३० एप्रिल रोजी पालिकेने विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे. जर हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच पाठविला गेला असता तर कदाचित विद्युत खांब हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली असती. केवळ मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलाचे काम रखडत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.

५ लाख नागरिकांना बसतोय फटका

दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच आता पूर्णपणे काम थांबल्यामुळे या पुलाचेही काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा काळ जाणार आहे. त्यामुळे ५ लाख नागरिकांना अजून काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे. जूनपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, आता विद्युत खांब काढण्याच्या कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे थांबल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कोट..

शिवाजीनगर भागातील नागरिकांचा अंत पाहू नका

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला आधीच मोठ्या प्रमाणावर उशीर झाला आहे. त्यात मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्युत खांब हटवण्याचा प्रस्ताव उशिराने पाठवला गेला आहे. त्यामुळे हे काम लांबत आहे. यामुळे शिवाजीनगरवासीयांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील नागरिकांनादेखील यामुळे फटका बसत आहे. प्रशासनाने शिवाजीनगरमधील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये.

-सुरेश भोळे, आमदार

विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच महासभेने मंजूर केल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र, तीन महिने आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेतच धूळ खात पडू दिला. महापालिका आयुक्तांमुळेच विद्युत खांब काढण्याच्या कामाला गती मिळत नसून, रखडलेल्या कामाला मनपा आयुक्त जबाबदार आहेत.

-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, शिवाजीनगर