शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या कामाला अडथळा ठरणारा विद्युत खांब हटवण्याचा ठराव फेब्रुवारी महिन्यात होऊन देखील मनपा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तब्बल तीन महिने उशिराने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याने या पुलाच्या कामाला उशीर होत आहे.

१८ महिन्यांत या पुलाचे काम होणे अपेक्षित असताना, आता २६ महिने होऊन देखील पुलाचे काम अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. पुलाच्या कामाला पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत आहेत. हे विद्युत खांब काढण्याचे काम महावितरणकडे देण्यात आले होते. मात्र, महावितरणकडे निधी नसल्याने हे काम रखडले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने पुलाच्या कामाला होणाऱ्या उशीरामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री निधी अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांपैकी शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला.

ठराव झाला फेब्रुवारीत, प्रस्ताव पाठविला ३० एप्रिलला

विद्युत खांब मनपाच्यावतीने काढून घेण्याचा ठराव ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत मंजूर करून घेण्यात आला. या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झाल्यानंतर तत्काळ पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, तब्बल तीन महिने हा ठराव मनपा आयुक्तांकडे पडून होता. तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे ३० एप्रिल रोजी पालिकेने विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे. जर हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच पाठविला गेला असता तर कदाचित विद्युत खांब हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली असती. केवळ मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलाचे काम रखडत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.

५ लाख नागरिकांना बसतोय फटका

दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच आता पूर्णपणे काम थांबल्यामुळे या पुलाचेही काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा काळ जाणार आहे. त्यामुळे ५ लाख नागरिकांना अजून काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे. जूनपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, आता विद्युत खांब काढण्याच्या कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे थांबल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कोट..

शिवाजीनगर भागातील नागरिकांचा अंत पाहू नका

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला आधीच मोठ्या प्रमाणावर उशीर झाला आहे. त्यात मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्युत खांब हटवण्याचा प्रस्ताव उशिराने पाठवला गेला आहे. त्यामुळे हे काम लांबत आहे. यामुळे शिवाजीनगरवासीयांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील नागरिकांनादेखील यामुळे फटका बसत आहे. प्रशासनाने शिवाजीनगरमधील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये.

-सुरेश भोळे, आमदार

विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच महासभेने मंजूर केल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र, तीन महिने आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेतच धूळ खात पडू दिला. महापालिका आयुक्तांमुळेच विद्युत खांब काढण्याच्या कामाला गती मिळत नसून, रखडलेल्या कामाला मनपा आयुक्त जबाबदार आहेत.

-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, शिवाजीनगर