शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

विद्युत खांब काढण्याचा प्रस्ताव तब्बल तीन महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील ५० हजार नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या कामाला अडथळा ठरणारा विद्युत खांब हटवण्याचा ठराव फेब्रुवारी महिन्यात होऊन देखील मनपा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तब्बल तीन महिने उशिराने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याने या पुलाच्या कामाला उशीर होत आहे.

१८ महिन्यांत या पुलाचे काम होणे अपेक्षित असताना, आता २६ महिने होऊन देखील पुलाचे काम अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. पुलाच्या कामाला पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब मुख्य अडथळा ठरत आहेत. हे विद्युत खांब काढण्याचे काम महावितरणकडे देण्यात आले होते. मात्र, महावितरणकडे निधी नसल्याने हे काम रखडले होते. शिवाजीनगर उड्डाणपूल हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने पुलाच्या कामाला होणाऱ्या उशीरामुळे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री निधी अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांपैकी शिल्लक दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला.

ठराव झाला फेब्रुवारीत, प्रस्ताव पाठविला ३० एप्रिलला

विद्युत खांब मनपाच्यावतीने काढून घेण्याचा ठराव ३ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत मंजूर करून घेण्यात आला. या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झाल्यानंतर तत्काळ पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, तब्बल तीन महिने हा ठराव मनपा आयुक्तांकडे पडून होता. तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे ३० एप्रिल रोजी पालिकेने विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे. जर हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच पाठविला गेला असता तर कदाचित विद्युत खांब हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली असती. केवळ मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलाचे काम रखडत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.

५ लाख नागरिकांना बसतोय फटका

दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच आता पूर्णपणे काम थांबल्यामुळे या पुलाचेही काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा काळ जाणार आहे. त्यामुळे ५ लाख नागरिकांना अजून काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे. जूनपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, आता विद्युत खांब काढण्याच्या कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे थांबल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कोट..

शिवाजीनगर भागातील नागरिकांचा अंत पाहू नका

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला आधीच मोठ्या प्रमाणावर उशीर झाला आहे. त्यात मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्युत खांब हटवण्याचा प्रस्ताव उशिराने पाठवला गेला आहे. त्यामुळे हे काम लांबत आहे. यामुळे शिवाजीनगरवासीयांसह जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील नागरिकांनादेखील यामुळे फटका बसत आहे. प्रशासनाने शिवाजीनगरमधील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये.

-सुरेश भोळे, आमदार

विद्युत खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच महासभेने मंजूर केल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र, तीन महिने आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेतच धूळ खात पडू दिला. महापालिका आयुक्तांमुळेच विद्युत खांब काढण्याच्या कामाला गती मिळत नसून, रखडलेल्या कामाला मनपा आयुक्त जबाबदार आहेत.

-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, शिवाजीनगर