शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:44 IST

शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे,

ठळक मुद्देअमळनेरातील साहित्य प्रेमींची सुरू आहे धडपडमराठी साहित्य संघाध्यक्षांना दिले पत्र

अमळनेर, जि.जळगाव : शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती स्थानिक शाखाध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली१९५२ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला भरले होते. त्यानंतर संत सखाराम महाराज, सानेगुरुजी, श्रीमंत प्रताप शेठ व अझीम प्रेमजी यासारख्या अमळनेरात कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या महान व्यक्तींना अभिवादन करण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.गेल्या चार वर्षांपासून अमळनेरला साहित्य संमेलन व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र साहित्य संमेलन झाले आहे. फक्त उत्तर महाराष्ट्र बाकी असल्याने यंदा संधी मिळेल, अशी आशा आहे. १० जणांची समिती प्रत्यक्ष पाहणी करेल. मग निर्णय घेतला जाईल. मात्र संमेलनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली असून, मराठी वाङ्मय मंडळ संमेलन घेण्यास सक्षम आहे, असेही डॉ.जोशी म्हणाले.यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर तालुक्याचे शरद धनगर, कुणाल पवार, रमेश पवार आदींना प्रत्यक्ष कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण आले होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकAmalnerअमळनेर