शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:44 IST

शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे,

ठळक मुद्देअमळनेरातील साहित्य प्रेमींची सुरू आहे धडपडमराठी साहित्य संघाध्यक्षांना दिले पत्र

अमळनेर, जि.जळगाव : शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती स्थानिक शाखाध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली१९५२ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला भरले होते. त्यानंतर संत सखाराम महाराज, सानेगुरुजी, श्रीमंत प्रताप शेठ व अझीम प्रेमजी यासारख्या अमळनेरात कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या महान व्यक्तींना अभिवादन करण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.गेल्या चार वर्षांपासून अमळनेरला साहित्य संमेलन व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र साहित्य संमेलन झाले आहे. फक्त उत्तर महाराष्ट्र बाकी असल्याने यंदा संधी मिळेल, अशी आशा आहे. १० जणांची समिती प्रत्यक्ष पाहणी करेल. मग निर्णय घेतला जाईल. मात्र संमेलनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली असून, मराठी वाङ्मय मंडळ संमेलन घेण्यास सक्षम आहे, असेही डॉ.जोशी म्हणाले.यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर तालुक्याचे शरद धनगर, कुणाल पवार, रमेश पवार आदींना प्रत्यक्ष कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण आले होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकAmalnerअमळनेर