शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By admin | Updated: June 8, 2017 16:56 IST

35 एमएलडी पाण्याचा पुनर्वापर : दीपनगर वीज केंद्राला देणार पाणी

 ऑनलाईन लोकमत विशेष/पंढरीनाथ गवळी

भुसावळ, दि.8 - भुसावळ शहरातील तब्बल  35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो तातडीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर
पालिकेच्या या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाण्यावर वीज निर्मिती करणे शक्य असल्याने भुसावळ पालिका या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शहराजवळील महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला विकत देणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी तापीनदीतून जे पाणी उचलले जात आहे त्याची बचत होईल. यामुळे पालिकेला कायम स्वरुपी चांगले उत्पन्न मिळेल  व  पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर प्रशासनाला वीज निर्मितीसाठी दिल्यानंतर दीपनगरातील शुद्ध पाणी भुसावळकरांना देण्याचेही नियोजन आहे.
शहरातून रोज निघणारे सुमारे 35 एमएलडी सांडपाणी शहराजवळील तापीनदीत जाते. त्यामुळे तापीनदीतील पाणी अशुद्ध होते. शहरातील सांडपाणी तापीनदीत न सोडता ते एका ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पालिका सुरू करणार आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असेही  रमण भोळे म्हणाले.
अमृत योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पालिकेचा समावेश आहे. अमृत योजनेतूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कंडारी गावाचाही समावेश
भुसावळ शहराजवळील कंडारी या सुमारे 20 हजार लोकसंख्येच्या गावातील सांडपाण्यावर देखील भविष्यात पालिका प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करेल. कंडारी व परीसरातील सांडपाणी नदी पात्रात जावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे कंडारी ग्रा.पं.ला उत्पन्न मिळेल.
सांडपाण्यावर वीज निर्मिती
भुसावळ शहरातून तापीनदीत जाणारे 35 एमएलडी सांडपाणी तापीनदी काठावर एका ठराविक जागी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून निघणारे पाणी पाईप लाईनद्वारे येथून पाच कि.मी.अंतरावरील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला ते विकण्यात येईल. त्यातून भुसावळ पालिकेला उत्पन्न मिळेल.
अमृत योजनेची देण
भुसावळ पालिकेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश झाली बाब शहरवासीयांसाठी आनंदाची आहे. याच योजनेतून शहरातील सांडपाण्यावर (रिसायकलिंग) प्रक्रिया करुन त्याचा वीज निर्मितीसारख्या कार्यासाठी वापर करणे ही भूषणावह बाब ठरणार आहे. असा प्रकल्प नागपूर महापालिका राबवित आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
मॉडेल प्रकल्प..
भुसावळ पालिकेचा हा सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर  प्रकल्प नाशिक महसूल विभागासह राज्यात आदर्श (मॉडेल प्रोजेक्ट) प्रकल्प राहील. यासाठी आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. तांत्रिक बाबींसह प्रस्ताव तयार केला जात आहे, असे भोळे म्हणाले.
दोन लाख नागरिकांना विम्याचे कवच
भुसावळ पालिका शहरात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे, फॅक्टरी आणि वीज कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील प्रत्येक रहिवाशाला पालिकेकडून विम्याचे कवच दिले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ शहराची सुमारे दोन लाख इतकी लोकसंख्या आहे. या दोन लाख लोकांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाला पालिका दोन लाख रुपयांचे विमा कवच देईल. कोणावर दु:खद प्रसंग ओढवला तर अशा व्यक्तीला त्याचा फायदा होईल.