शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By admin | Updated: June 8, 2017 16:56 IST

35 एमएलडी पाण्याचा पुनर्वापर : दीपनगर वीज केंद्राला देणार पाणी

 ऑनलाईन लोकमत विशेष/पंढरीनाथ गवळी

भुसावळ, दि.8 - भुसावळ शहरातील तब्बल  35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो तातडीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर
पालिकेच्या या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाण्यावर वीज निर्मिती करणे शक्य असल्याने भुसावळ पालिका या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शहराजवळील महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला विकत देणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी तापीनदीतून जे पाणी उचलले जात आहे त्याची बचत होईल. यामुळे पालिकेला कायम स्वरुपी चांगले उत्पन्न मिळेल  व  पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर प्रशासनाला वीज निर्मितीसाठी दिल्यानंतर दीपनगरातील शुद्ध पाणी भुसावळकरांना देण्याचेही नियोजन आहे.
शहरातून रोज निघणारे सुमारे 35 एमएलडी सांडपाणी शहराजवळील तापीनदीत जाते. त्यामुळे तापीनदीतील पाणी अशुद्ध होते. शहरातील सांडपाणी तापीनदीत न सोडता ते एका ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पालिका सुरू करणार आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असेही  रमण भोळे म्हणाले.
अमृत योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पालिकेचा समावेश आहे. अमृत योजनेतूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कंडारी गावाचाही समावेश
भुसावळ शहराजवळील कंडारी या सुमारे 20 हजार लोकसंख्येच्या गावातील सांडपाण्यावर देखील भविष्यात पालिका प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करेल. कंडारी व परीसरातील सांडपाणी नदी पात्रात जावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे कंडारी ग्रा.पं.ला उत्पन्न मिळेल.
सांडपाण्यावर वीज निर्मिती
भुसावळ शहरातून तापीनदीत जाणारे 35 एमएलडी सांडपाणी तापीनदी काठावर एका ठराविक जागी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून निघणारे पाणी पाईप लाईनद्वारे येथून पाच कि.मी.अंतरावरील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला ते विकण्यात येईल. त्यातून भुसावळ पालिकेला उत्पन्न मिळेल.
अमृत योजनेची देण
भुसावळ पालिकेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश झाली बाब शहरवासीयांसाठी आनंदाची आहे. याच योजनेतून शहरातील सांडपाण्यावर (रिसायकलिंग) प्रक्रिया करुन त्याचा वीज निर्मितीसारख्या कार्यासाठी वापर करणे ही भूषणावह बाब ठरणार आहे. असा प्रकल्प नागपूर महापालिका राबवित आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
मॉडेल प्रकल्प..
भुसावळ पालिकेचा हा सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर  प्रकल्प नाशिक महसूल विभागासह राज्यात आदर्श (मॉडेल प्रोजेक्ट) प्रकल्प राहील. यासाठी आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. तांत्रिक बाबींसह प्रस्ताव तयार केला जात आहे, असे भोळे म्हणाले.
दोन लाख नागरिकांना विम्याचे कवच
भुसावळ पालिका शहरात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे, फॅक्टरी आणि वीज कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील प्रत्येक रहिवाशाला पालिकेकडून विम्याचे कवच दिले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ शहराची सुमारे दोन लाख इतकी लोकसंख्या आहे. या दोन लाख लोकांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाला पालिका दोन लाख रुपयांचे विमा कवच देईल. कोणावर दु:खद प्रसंग ओढवला तर अशा व्यक्तीला त्याचा फायदा होईल.