शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळातील सांडपाणी प्रक्रियेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By admin | Updated: June 8, 2017 16:56 IST

35 एमएलडी पाण्याचा पुनर्वापर : दीपनगर वीज केंद्राला देणार पाणी

 ऑनलाईन लोकमत विशेष/पंढरीनाथ गवळी

भुसावळ, दि.8 - भुसावळ शहरातील तब्बल  35 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो तातडीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर
पालिकेच्या या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाण्यावर वीज निर्मिती करणे शक्य असल्याने भुसावळ पालिका या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शहराजवळील महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला विकत देणार आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी तापीनदीतून जे पाणी उचलले जात आहे त्याची बचत होईल. यामुळे पालिकेला कायम स्वरुपी चांगले उत्पन्न मिळेल  व  पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर प्रशासनाला वीज निर्मितीसाठी दिल्यानंतर दीपनगरातील शुद्ध पाणी भुसावळकरांना देण्याचेही नियोजन आहे.
शहरातून रोज निघणारे सुमारे 35 एमएलडी सांडपाणी शहराजवळील तापीनदीत जाते. त्यामुळे तापीनदीतील पाणी अशुद्ध होते. शहरातील सांडपाणी तापीनदीत न सोडता ते एका ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पालिका सुरू करणार आहे, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असेही  रमण भोळे म्हणाले.
अमृत योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पालिकेचा समावेश आहे. अमृत योजनेतूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कंडारी गावाचाही समावेश
भुसावळ शहराजवळील कंडारी या सुमारे 20 हजार लोकसंख्येच्या गावातील सांडपाण्यावर देखील भविष्यात पालिका प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करेल. कंडारी व परीसरातील सांडपाणी नदी पात्रात जावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे कंडारी ग्रा.पं.ला उत्पन्न मिळेल.
सांडपाण्यावर वीज निर्मिती
भुसावळ शहरातून तापीनदीत जाणारे 35 एमएलडी सांडपाणी तापीनदी काठावर एका ठराविक जागी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून निघणारे पाणी पाईप लाईनद्वारे येथून पाच कि.मी.अंतरावरील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्राला ते विकण्यात येईल. त्यातून भुसावळ पालिकेला उत्पन्न मिळेल.
अमृत योजनेची देण
भुसावळ पालिकेचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेत समावेश झाली बाब शहरवासीयांसाठी आनंदाची आहे. याच योजनेतून शहरातील सांडपाण्यावर (रिसायकलिंग) प्रक्रिया करुन त्याचा वीज निर्मितीसारख्या कार्यासाठी वापर करणे ही भूषणावह बाब ठरणार आहे. असा प्रकल्प नागपूर महापालिका राबवित आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न वाढले आहे.
मॉडेल प्रकल्प..
भुसावळ पालिकेचा हा सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर  प्रकल्प नाशिक महसूल विभागासह राज्यात आदर्श (मॉडेल प्रोजेक्ट) प्रकल्प राहील. यासाठी आतापासूनच आमचे नियोजन सुरू आहे. तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. तांत्रिक बाबींसह प्रस्ताव तयार केला जात आहे, असे भोळे म्हणाले.
दोन लाख नागरिकांना विम्याचे कवच
भुसावळ पालिका शहरात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे, फॅक्टरी आणि वीज कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील प्रत्येक रहिवाशाला पालिकेकडून विम्याचे कवच दिले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ शहराची सुमारे दोन लाख इतकी लोकसंख्या आहे. या दोन लाख लोकांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाला पालिका दोन लाख रुपयांचे विमा कवच देईल. कोणावर दु:खद प्रसंग ओढवला तर अशा व्यक्तीला त्याचा फायदा होईल.