शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

निषेधाचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:40 IST

घोषणा देत युवक उतरले रस्त्यावर

ठळक मुद्देव्यापाऱ्यांसह हमाल, कामगारांचाही सहभाग ; २०० कोटींची उलाढाल ठप्प

जळगाव-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ शनिवारी शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होती. तसेच शहरात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेधार्थ पाकीस्तानचे झेंडे जाळण्यात आले, तसेच अनेक युवकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यांवर येवून ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देताना दिसून आले.सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हाच संताप शनिवारी जळगावच्या तरुणांमध्ये दिसून आला. कोठल्याही पुर्वघोषणेशिवाय, कोणाच्याही दबावात किंवा कोणाच्याही सूचनेशिवाय केवळ स्वयंस्फुर्तीने जळगावकरांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ कडकडीत बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेतला. व्यापारी, हमाल, कामगारांसह सर्वच स्तरावरील व्यावसायीकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.दाणाबाजारात कडकडीत बंददाणा बाजार असोसिएशनकडून देखील शनिवारी बंद पुकारण्यात आला. सकाळी १० वाजता दाणाबाजारातील सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येवून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये व्यवहार थांबवण्यात आले आहेत. नागरिकांसह व्यापाºयांनी स्वेच्छेने हा बंद पाळून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. शनिवार हा बाजाराचा दिवस असतानाही दाणा बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे तब्बल १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारीया यांनी दिली.‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी दणाणले गोलाणी मार्केटगोलाणी मार्केटमध्येही सर्व व्यापारी व व्यावसायीकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व व्यावसायीक मार्केटमध्ये एकत्र येवून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘वंदे मातरम, भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी गोलाणी मार्केट दणाणून निघाले होते. सर्व व्यापारी बांधवांकडून यावेळी आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील बंद मध्ये सहभागी असलेल्या युवकांनी घेतली.