शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

व्यावसायिक शिक्षण हेच देशाचे भवितव्य-डॉ.दीपक शिकारपूर

By admin | Updated: June 12, 2017 13:00 IST

डॉ.दीपक शिकारपूर यांची ‘लोकमत’ला भेट : अभ्यासक्रमातही बदल करणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.12 - माहिती तंत्रज्ञानाबाबत देशात पाहिजे त्या गतीने अजूनही बदल होत नसल्याचे दिसून येते. हे बदल वेगाने घडायला हवेत. डिजिटल शिक्षणाबाबत फारशी साक्षरता नाही. पण आपण अजूनही पदवी प्रतिष्ठेत जगतो. दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले म्हणजे आपण परिपूर्ण असतो, असे नाही. व्यावसायिक शिक्षण हेच देशाचे भवितव्य आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायला हवेत, असे मत अखिल भारतीय माहिती तंत्रज्ञान शिक्षण बोर्डाचे सदस्य व रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3131 चे माजी गव्हर्नर डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. 
डॉ.दीपक शिकारपूर यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी डॉ.शिकारपूर यांचे  स्वागत केले. यावेळी रोटरी इस्टचे अध्यक्ष संजय शहा उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, देशातील स्थिती, सायबर क्राईम आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. 
डॉ.शिकारपूर म्हणाले,  तंत्रज्ञान बदलत आहे.  अॅप आले. आता पुढे आणखी नवीन काही तरी येईल. अनेक संधी निर्माण होत आहे. हार्डवेअर, नेटवर्किग मेन्टनन्स यासंदर्भात अनेक कामे, प्रकल्प असतात. पण या क्षेत्रात जे कुशल आहेत, त्यांना अधिक संधी आहे. जे कुशल नाहीत त्यांच्यासमोर अडचणी येतात. आपण भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली. जे आयटी तज्ज्ञ होतात त्यांना लागलीच परदेशात जायचे असते, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी हवी असते. पण एकाच ठिकाणी हे शक्य नाही. त्यासाठी पोषक वातावरण असावे. आपल्याकडे अजूनही पदवीला प्रतिष्ठा आहे. परदेशात कौशल्य महत्त्वाचे मानले जाते. श्रमाला प्रतिष्ठा हवी. ऑटोमोबाईल अभियंताची पदवी असते, पण वाहनाचे पंक्चर दुरुस्त करता येत नाही, टायर बदलता येत नाही. शिक्षण व्यवस्थेत बदल करायला हवा.  पूरक शाखेचे शिक्षण घेतले पाहिजे. अभ्यासक्रमातही बदल करणे आवश्यक आहे. 
एकलव्य बनून शिक्षण घ्या
सरकारच्या कौशल्य विकास योजनेबाबत काय मत आहे, असे विचारले असता डॉ. शिकारपूर म्हणाले, सरकारबाबत मी मत मांडणार नाही. एकलव्य बनून शिक्षण आपण घेतले पाहिजे. घरबसल्याही संगणक, माहिती तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता येते. संकटे येतात, त्यातून मार्ग काढावा. विद्याथ्र्याना व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. भविष्यात त्याला खूप महत्व येईल. तसेच विद्याथ्र्याना समस्या सोडविण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. 
सायबर गुन्हे रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक 
आपल्याकडे डिजिटल यंत्रणेवर भर दिला जात आहे, दुस:या बाजूला सायबर गुन्हेही वाढत आहेत. याला प्रतिबंध कसा करता येईल? याबाबत डॉ.शिकारपूर म्हणाले, सायबर क्राईम हा गुंतागुंतीचा विषय आहे. एका प्रकरणात तर एका आयटी तज्ज्ञ व त्याच्या पत्नीचीही फसवणूक झाली आहे. फसव्या माहितीपासून सतर्क राहणे हे सर्वानी लक्षात ठेवायला हवे. बहुसंख्य सायबर गुन्हेगार हे देशाबाहेर राहून नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे खबरदारी घेवुन फसवणूक झाल्यावर पोलिसात तक्रार करावीे. 
सरकारवर विसंबून राहू नका
संगणक, माहिती तंत्रज्ञान याचे शिक्षण घेण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला हवा. कुठलीही भीती बाळगायला नको. सरकारवर अवलंबून राहू नका. आपण काहीच करीत नाही व सरकारला दोष देतो, असे व्हायला नको. नागरिक, विद्यार्थी यांची मानसिकता बदलायला हवी. विद्याथ्र्यावर संस्कार करा. त्यांना चांगले नागरिक कसे बनविता येईल यासाठी शाळेतूनच प्रयत्न व्हावेत.