शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

व्यावसायिक शिक्षण हेच देशाचे भवितव्य-डॉ.दीपक शिकारपूर

By admin | Updated: June 12, 2017 13:00 IST

डॉ.दीपक शिकारपूर यांची ‘लोकमत’ला भेट : अभ्यासक्रमातही बदल करणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.12 - माहिती तंत्रज्ञानाबाबत देशात पाहिजे त्या गतीने अजूनही बदल होत नसल्याचे दिसून येते. हे बदल वेगाने घडायला हवेत. डिजिटल शिक्षणाबाबत फारशी साक्षरता नाही. पण आपण अजूनही पदवी प्रतिष्ठेत जगतो. दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले म्हणजे आपण परिपूर्ण असतो, असे नाही. व्यावसायिक शिक्षण हेच देशाचे भवितव्य आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायला हवेत, असे मत अखिल भारतीय माहिती तंत्रज्ञान शिक्षण बोर्डाचे सदस्य व रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3131 चे माजी गव्हर्नर डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. 
डॉ.दीपक शिकारपूर यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी डॉ.शिकारपूर यांचे  स्वागत केले. यावेळी रोटरी इस्टचे अध्यक्ष संजय शहा उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, देशातील स्थिती, सायबर क्राईम आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. 
डॉ.शिकारपूर म्हणाले,  तंत्रज्ञान बदलत आहे.  अॅप आले. आता पुढे आणखी नवीन काही तरी येईल. अनेक संधी निर्माण होत आहे. हार्डवेअर, नेटवर्किग मेन्टनन्स यासंदर्भात अनेक कामे, प्रकल्प असतात. पण या क्षेत्रात जे कुशल आहेत, त्यांना अधिक संधी आहे. जे कुशल नाहीत त्यांच्यासमोर अडचणी येतात. आपण भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली. जे आयटी तज्ज्ञ होतात त्यांना लागलीच परदेशात जायचे असते, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी हवी असते. पण एकाच ठिकाणी हे शक्य नाही. त्यासाठी पोषक वातावरण असावे. आपल्याकडे अजूनही पदवीला प्रतिष्ठा आहे. परदेशात कौशल्य महत्त्वाचे मानले जाते. श्रमाला प्रतिष्ठा हवी. ऑटोमोबाईल अभियंताची पदवी असते, पण वाहनाचे पंक्चर दुरुस्त करता येत नाही, टायर बदलता येत नाही. शिक्षण व्यवस्थेत बदल करायला हवा.  पूरक शाखेचे शिक्षण घेतले पाहिजे. अभ्यासक्रमातही बदल करणे आवश्यक आहे. 
एकलव्य बनून शिक्षण घ्या
सरकारच्या कौशल्य विकास योजनेबाबत काय मत आहे, असे विचारले असता डॉ. शिकारपूर म्हणाले, सरकारबाबत मी मत मांडणार नाही. एकलव्य बनून शिक्षण आपण घेतले पाहिजे. घरबसल्याही संगणक, माहिती तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता येते. संकटे येतात, त्यातून मार्ग काढावा. विद्याथ्र्याना व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. भविष्यात त्याला खूप महत्व येईल. तसेच विद्याथ्र्याना समस्या सोडविण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. 
सायबर गुन्हे रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक 
आपल्याकडे डिजिटल यंत्रणेवर भर दिला जात आहे, दुस:या बाजूला सायबर गुन्हेही वाढत आहेत. याला प्रतिबंध कसा करता येईल? याबाबत डॉ.शिकारपूर म्हणाले, सायबर क्राईम हा गुंतागुंतीचा विषय आहे. एका प्रकरणात तर एका आयटी तज्ज्ञ व त्याच्या पत्नीचीही फसवणूक झाली आहे. फसव्या माहितीपासून सतर्क राहणे हे सर्वानी लक्षात ठेवायला हवे. बहुसंख्य सायबर गुन्हेगार हे देशाबाहेर राहून नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे खबरदारी घेवुन फसवणूक झाल्यावर पोलिसात तक्रार करावीे. 
सरकारवर विसंबून राहू नका
संगणक, माहिती तंत्रज्ञान याचे शिक्षण घेण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला हवा. कुठलीही भीती बाळगायला नको. सरकारवर अवलंबून राहू नका. आपण काहीच करीत नाही व सरकारला दोष देतो, असे व्हायला नको. नागरिक, विद्यार्थी यांची मानसिकता बदलायला हवी. विद्याथ्र्यावर संस्कार करा. त्यांना चांगले नागरिक कसे बनविता येईल यासाठी शाळेतूनच प्रयत्न व्हावेत.