शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दहा हजाराच्यांवर रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्‍याचे शासनाने घोषित केले आहे. प्रत्यक्षात जळगावात दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्‍याचे शासनाने घोषित केले आहे. प्रत्यक्षात जळगावात दहा हजारांवर परवानाधारक रिक्षाचालक आहेत, त्यांना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याचा लाभ आता केव्हा मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सध्‍याच्या महागाई इतकी आहे, त्यामध्‍ये सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी ही मदत किती पुरणार? असा सवाल रिक्षाचालकांनी केला आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू घातले आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजारांची मदत जाहीर केली. या मिळणाऱ्या रकमेतून रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे, असे जरी आपण म्हणत असलो तरी रिक्षाचालक मात्र यावर खुश नाहीत. परवान्यासाठी दहा हजार रुपये शासनाने घेतले आहेत. तीन जणांची परवानगी असताना शासनाने कोरोनामुळे दोघांनाच परवानगी दिली आहे. प्रवाशांची ने-आण करताना रिक्षाचालकांना इंधनामुळे ते परवडणारे नाही. त्यात महागाईदेखील आहे. आर्थिक घडी बिघडलेली असताना, शासनाकडून पाच ते दहा रुपयांची मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दीड हजार रुपये मदत दिली जात आहे. ही मदत किती दिवस पुरेल? असा सवाल रिक्षाचालकांनी केली आहे. मदत जाहीर केली आहे तर तिची अंमलबजावणीदेखील व्हावी. अन्यथा रिक्षाचालकांना आश्वासनच मिळत असल्याची प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिली.

===============

परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या..

१०,०००

==============

मागील वर्षी सुद्धा शासनाने मदतीचे आश्वासन दिले होते. आता दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. पण, ती प्रत्यक्षात मिळेल, तेव्हाच विश्वास होईल. कारण रिक्षाचालकांना दरवेळी आश्वासनच मिळतात.

- अब्दूल रहेमान, रिक्षाचालक

जळगावात दहा हजारांवर परवानाधारक आहे. त्यांना ही मदत मिळेल. पण, प्रत्यक्षात ही मदत कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. आधीच रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात पेट्रोलचेही दर अधिक आहे. तुटपुंजी मदत किती दिवस पुरणार.

- नाना अडकमोल, रिक्षाचालक

रिक्षा चालते तेव्हा घर चालते. पण, सध्‍या कडक निर्बंध घालून देण्‍यात आलेले आहे. परिणामी, याचा व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. मागील वर्षपूर्णपणे लॉकडाऊनमध्‍ये गेले. त्यातून सावरत नाही. तोच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यात महामागाईने आग ओकली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट मदत करावी व ती लवकर द्यावी.

- प्रवीण माळी, रिक्षाचालक