शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजाराच्यांवर रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्‍याचे शासनाने घोषित केले आहे. प्रत्यक्षात जळगावात दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्‍याचे शासनाने घोषित केले आहे. प्रत्यक्षात जळगावात दहा हजारांवर परवानाधारक रिक्षाचालक आहेत, त्यांना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याचा लाभ आता केव्हा मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सध्‍याच्या महागाई इतकी आहे, त्यामध्‍ये सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी ही मदत किती पुरणार? असा सवाल रिक्षाचालकांनी केला आहे.

शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू घातले आहेत. त्यात हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजारांची मदत जाहीर केली. या मिळणाऱ्या रकमेतून रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न सुटला आहे, असे जरी आपण म्हणत असलो तरी रिक्षाचालक मात्र यावर खुश नाहीत. परवान्यासाठी दहा हजार रुपये शासनाने घेतले आहेत. तीन जणांची परवानगी असताना शासनाने कोरोनामुळे दोघांनाच परवानगी दिली आहे. प्रवाशांची ने-आण करताना रिक्षाचालकांना इंधनामुळे ते परवडणारे नाही. त्यात महागाईदेखील आहे. आर्थिक घडी बिघडलेली असताना, शासनाकडून पाच ते दहा रुपयांची मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दीड हजार रुपये मदत दिली जात आहे. ही मदत किती दिवस पुरेल? असा सवाल रिक्षाचालकांनी केली आहे. मदत जाहीर केली आहे तर तिची अंमलबजावणीदेखील व्हावी. अन्यथा रिक्षाचालकांना आश्वासनच मिळत असल्याची प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिली.

===============

परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या..

१०,०००

==============

मागील वर्षी सुद्धा शासनाने मदतीचे आश्वासन दिले होते. आता दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. पण, ती प्रत्यक्षात मिळेल, तेव्हाच विश्वास होईल. कारण रिक्षाचालकांना दरवेळी आश्वासनच मिळतात.

- अब्दूल रहेमान, रिक्षाचालक

जळगावात दहा हजारांवर परवानाधारक आहे. त्यांना ही मदत मिळेल. पण, प्रत्यक्षात ही मदत कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. आधीच रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात पेट्रोलचेही दर अधिक आहे. तुटपुंजी मदत किती दिवस पुरणार.

- नाना अडकमोल, रिक्षाचालक

रिक्षा चालते तेव्हा घर चालते. पण, सध्‍या कडक निर्बंध घालून देण्‍यात आलेले आहे. परिणामी, याचा व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. मागील वर्षपूर्णपणे लॉकडाऊनमध्‍ये गेले. त्यातून सावरत नाही. तोच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यात महामागाईने आग ओकली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट मदत करावी व ती लवकर द्यावी.

- प्रवीण माळी, रिक्षाचालक