शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्यांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:21 IST

महा अवयवदान अभियान : कैद्याने दिले संमतीपत्र भरून

ठळक मुद्देमृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहाउपस्थित कैद्यांनी केली अवयवदानाची प्रतिज्ञा बहुतांश कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  

राज्यात महा अवयवदान महोत्सव सुरू असून या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील कैदी सचिन गुमानसिंग जाधव याने मृत्यूपश्चात अवयवनदान करण्याचे संमती पत्र जिल्हा कारागृह अधीक्षक सुनील कुवर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे भरुन दिले.  या कैद्याच्या निर्णयाचे उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात कौतूक केले. या वेळी 436 कैदी उपस्थित होते. बहुतांश कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला असून ते संमतीपत्र नंतर भरुन देणार आहे. महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, व जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमानिमित्त  जिल्हा कारागृहात अवयवदानाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. एन. एस. चव्हाण, सुनील कुवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जी. एम फाउंडेशनचे अरविंद देशमुख, आरोग्य दीप किडनी फाउंडेशनचे डॉ. शशिकांत गाजरे, अयाज मोहसीन, सागर महाजन आदी उपस्थित होते.

मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहा मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  चव्हाण म्हणाले की, शरीर हे नष्ट होणारे आहे. मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहायचे असेल तर अवयवदान केले पाहिजे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना आपण शरीराचे कोणते अवयव कधी दान करू शकतो हेच माहिती नसते. यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानाची जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगून अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली. कैद्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण वेगळा आहे. असे सांगून  सुनील कुवर म्हणाले की, कैदीहा कधीही वाईट नसतो तर त्याला परिस्थिती वाईट बनविते. कैद्यांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता आपणही समाजाचेच घटक आहोत असे समजून वागावे. कारागृहात आल्यानंतर त्यांच्यात निश्चित बदल होत असतो. याचे उदाहरण म्हणजे कैद्यांनी आज केलेला अवयवदान संकल्प होय. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा संकल्प करून समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचेही  कुवर यांनी सांगितले.  उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.  अवयवदान जनजागृती कार्यक्रमानंतर अनेक कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला. प्रातिनिधीक स्वरुपात बंदी सचिन  जाधव याने अवयवनदान संमती पत्र भरून दिले. उपस्थित कैद्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली. प्रति™ोचे वाचन विलास बोडके यांनी केले. ज्ञानेश्वर पांढरे, आनंदा पाटील यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  सागर महाजन यांनी आभार  मानले.