शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

मंदिरात जाण्यापूर्वीच पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. ...

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. योगेश्वर नगर, मूळ रा. सटना, मध्य प्रदेश) या तरुण पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता जुने जळगाव रोड परिसरातील तुळजाई नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुपम प्रसाद हे तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात पुजारी असून शेजारच्याच योगेश्वर नगरात ते वास्तव्याला होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पावणे सात वाजता पूजा व आरती करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. या ठिकाणी त्यांनी बाहेरील स्वच्छता केली. नंतर मंदिराच्या आवारात झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटण दाबण्यासाठी गेले असता त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होत असल्याने मंदिराच्या शेजारी रहात असलेल्या विमल कुदळ या मंदिरात आल्या असता त्यांना पुजारी प्रसाद पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळी तसेच झाडूच्या साहाय्याने वीजप्रवाह खंडित करून प्रसाद यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली तसेच पंचनामा केला. पुजारी प्रसाद हे मूळ मध्य प्रदेशातील सटना येथील रहिवासी आहे. सात वर्षांपासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आई-वडील गावाकडे असल्याने एकटेच राहत होते.

पावसामुळे उतरला वीजप्रवाह; शनिवारी झाला वर्धापन दिन

शनिवारी रात्री पाऊस झाल्याने त्यात काहीतरी बिघाड होऊन डीपीत वीजप्रवाह उतरला होता. सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी आपल्या कामाला लागले आणि त्यात ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ मध्ये साईगणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून अनुपम प्रसाद हेच पुजारी म्हणून काम पाहत होते. शनिवारी १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पुजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होऊन प्रसादाचे वाटप झाले होते. रविवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येऊन डीपीवरील पुरवठा खंडित करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र ७ तास उलटूनही वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.