शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मंदिरात जाण्यापूर्वीच पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. ...

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. योगेश्वर नगर, मूळ रा. सटना, मध्य प्रदेश) या तरुण पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता जुने जळगाव रोड परिसरातील तुळजाई नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुपम प्रसाद हे तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात पुजारी असून शेजारच्याच योगेश्वर नगरात ते वास्तव्याला होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पावणे सात वाजता पूजा व आरती करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. या ठिकाणी त्यांनी बाहेरील स्वच्छता केली. नंतर मंदिराच्या आवारात झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटण दाबण्यासाठी गेले असता त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होत असल्याने मंदिराच्या शेजारी रहात असलेल्या विमल कुदळ या मंदिरात आल्या असता त्यांना पुजारी प्रसाद पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळी तसेच झाडूच्या साहाय्याने वीजप्रवाह खंडित करून प्रसाद यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली तसेच पंचनामा केला. पुजारी प्रसाद हे मूळ मध्य प्रदेशातील सटना येथील रहिवासी आहे. सात वर्षांपासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आई-वडील गावाकडे असल्याने एकटेच राहत होते.

पावसामुळे उतरला वीजप्रवाह; शनिवारी झाला वर्धापन दिन

शनिवारी रात्री पाऊस झाल्याने त्यात काहीतरी बिघाड होऊन डीपीत वीजप्रवाह उतरला होता. सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी आपल्या कामाला लागले आणि त्यात ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ मध्ये साईगणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून अनुपम प्रसाद हेच पुजारी म्हणून काम पाहत होते. शनिवारी १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पुजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होऊन प्रसादाचे वाटप झाले होते. रविवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येऊन डीपीवरील पुरवठा खंडित करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र ७ तास उलटूनही वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.