शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

आयातीवरील बंदीने डाळी महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:54 IST

देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

विजयकुमार सैतवाल ।जळगाव : देशात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ दिवसांत तुरीसह सर्वच डाळींचे भाव प्रति किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. विशेष म्हणजे डाळींना मागणी नसली तरी भाववाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या आर्थिक वर्षात तब्बल दोन लाख मेट्रीक टन तूर आयात करण्यात आली. तुरीचे वाढलेले उत्पादन व आयात मालामुळे देशात साठा वाढल्याने शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ४ आॅगस्टला आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.आयातबंदीपूर्वी असलेले तुरीचे ३१०० ते ३२०० रुपये भाव आता ४००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तर तूरडाळीचे भाव ५ हजार रुपयांवरून ६,५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग यांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता असल्याने त्यांचेही भाव १० ते १५ रुपये प्रति किलोने वाढले आहेत.>असे वाढले भावगेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव ५० वरून ६५ रुपये प्रति किलो, मूगडाळ ५३ ते ५४ वरून ६४ रुपये, उडीदडाळ ५४ वरून ६४ रुपये, हरभराडाळ ६० वरून ७५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.आयात बंदी तसेच पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग यांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उडीद, मूग व हरभरा डाळींचेही भाव वाढले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन, जळगाव