शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

१00 गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा

By admin | Updated: January 30, 2015 14:57 IST

आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिले.

 

जळगाव : आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला दिले. जिल्हा नियोजन भवनात महाराष्ट्र राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाभरात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, पुरवठा अधिकारी विकास गजरे, राष्ट्रीय छात्रसेनेचे कर्नल के.व्ही.विठ्ठल, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, ५ बटालियन राष्ट्रीय आपत्ती दलाचे कुमार राजीवरंजन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नरविरसिंग रावळ उपस्थित होते. राजीवरंजन यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची माहिती देऊन या दलाचे देशातील विविध नैसर्गिक आपत्ती व त्यांच्या मदत कार्यात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार नरवीरसिंग रावळ यांनी मानले. जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, मनपा, नगर पालिका, तहसील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील २३ विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सात कार्यशाळा शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचा शाळा सुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. आपत्ती निवारणार्थ १६ पथके गठीत जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती निवारणात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. जिल्ह्यातील सर्वच कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा तयार करावा व सर्व कर्मचार्‍यांना आपत्तीच्या प्रसंगी काय करावे? यासाठी प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षणाला कर्मचार्‍यांनी प्रतिसाद द्यावा. स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांना त्यात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची १६ पथके जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.