शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तवली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. मात्र तिसरी लाट येईल तेव्हा तयारी करण्याऐवजी आतापासूनच या लाटेचा सामना करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्या साठीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यात लहान मुलांचे लसीकरण, तालुका स्तरावर वॉर रूम, मोठ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आतापासूनच जिल्हा प्रशासन तयारी करत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर वॉर रूमची स्थापना केली जाणार आहे. १५ जूनपासूनचा या वॉर रूमला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

लहान मुलांसाठी आणखी दहा व्हेंटिलेटर येणार

जिल्ह्यात लहान मुलांसाठी या आधी दहा नवे व्हेंटिलेटर आले आहेत. आता पुन्हा जिल्ह्यात दहा नवे लहान मुलांसाठीचे व्हेंटिलेटर येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या नियमित लसीकरणाचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती मुळातच चांगली असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास होऊ नये, यासाठी त्यांचे इतर नियमित लसींचे डोस त्यांना वेळेवर दिले जावे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

मोहाडी आणि चोपडा रुग्णालयात नव्या ऑक्सिजन टँकचा प्रस्ताव

जिल्ह्यात सध्या ११७ मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. आता मोहाडी महिला रुग्णालय आणि चोपडा ग्रामीण रुग्णालयात नव्या लिक्विड ऑक्सिजन टँक तयार केला जाणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे दोन नवे टँक तयार झाल्यात जिल्ह्यात १५१ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा केला जाऊ शकतो. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर फार अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन टँक, ड्युरा व जम्बो सिलिंडर यांचेदेखील नियोजन केले जात आहेत.

आरटीपीसीआर चाचण्या वाढवणार

सध्या रुग्ण कमी असल्याने आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला जात आहे. सध्या शासनाने ४० टक्के आरटीपीसीआर आणि ६० टक्के अँटिजन करण्याचे निर्देश आहेत. सध्या जिल्ह्यात ३५ टक्के आरटीपीसीआर आणि ६५ टक्के अँटिजन चाचण्या केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात हे प्रमाण येत्या महिनाभरात पूर्ण होईल.