शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

अवकाळीने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, शिरसोली, दापोरा, गाढोदा परिसरातील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे गहू, दादर, मक्याचे पीक आडवे पडले आहे, तर वादळामुळे केळीच्या कांदेबागेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रबीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा घास पावसामुळे हिरावला गेला आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे यंदा रबीच्या हंगामात त्याची भरपाई भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल ३५ ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली. यामुळे आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर आव्हाणे शिवारात गव्हाचे व हरभऱ्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

केळीचे नुकसान, गहूही झाला आडवा

कठोरा, भादली, भोकर या भागात जोरदार वादळासह झालेल्या पावसात केळीच्या कांदेबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीचे घड उन्मळून पडले आहेत. दापोरा परिसरातदेखील केळीचे नुकसान झाले आहे. वडली, शिरसोली परिसरातदेखील रबीच्या गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. गाढोदा, पळसोद भागातही रबीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा तापी व गिरणा नदीच्या मध्ये येणाऱ्या आमोदा, सावखेडा, कठोरा या भागात बसला आहे.

अजून दोन दिवस अवकाळीचे सावट

जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ तारखेपर्यंत सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात गहू, हरभरा व मका काढण्याचा स्थिती आले आहेत. अशावेळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

रात्रीच्या वेळेस सुमारे एक ते दोन तास झालेल्या वादळात महावितरणचेही पितळ उघडे पडले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील निम्म्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शिरसोली, आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता, तर कानळदा, नांदगाव भागातदेखील रात्रभर विजेचा लपंडाव सुरूच होता.