शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

अवकाळीने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, शिरसोली, दापोरा, गाढोदा परिसरातील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे गहू, दादर, मक्याचे पीक आडवे पडले आहे, तर वादळामुळे केळीच्या कांदेबागेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रबीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा घास पावसामुळे हिरावला गेला आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे यंदा रबीच्या हंगामात त्याची भरपाई भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल ३५ ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली. यामुळे आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर आव्हाणे शिवारात गव्हाचे व हरभऱ्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

केळीचे नुकसान, गहूही झाला आडवा

कठोरा, भादली, भोकर या भागात जोरदार वादळासह झालेल्या पावसात केळीच्या कांदेबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीचे घड उन्मळून पडले आहेत. दापोरा परिसरातदेखील केळीचे नुकसान झाले आहे. वडली, शिरसोली परिसरातदेखील रबीच्या गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. गाढोदा, पळसोद भागातही रबीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा तापी व गिरणा नदीच्या मध्ये येणाऱ्या आमोदा, सावखेडा, कठोरा या भागात बसला आहे.

अजून दोन दिवस अवकाळीचे सावट

जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ तारखेपर्यंत सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात गहू, हरभरा व मका काढण्याचा स्थिती आले आहेत. अशावेळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

रात्रीच्या वेळेस सुमारे एक ते दोन तास झालेल्या वादळात महावितरणचेही पितळ उघडे पडले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील निम्म्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शिरसोली, आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता, तर कानळदा, नांदगाव भागातदेखील रात्रभर विजेचा लपंडाव सुरूच होता.