शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने हिरावला शेतकऱ्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह जळगाव तालुक्यातील काही भागांत गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसात भोकर, भादली, कठोरा, आव्हाणे, शिरसोली, दापोरा, गाढोदा परिसरातील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे गहू, दादर, मक्याचे पीक आडवे पडले आहे, तर वादळामुळे केळीच्या कांदेबागेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रबीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा घास पावसामुळे हिरावला गेला आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे यंदा रबीच्या हंगामात त्याची भरपाई भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल ३५ ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली. यामुळे आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर आव्हाणे शिवारात गव्हाचे व हरभऱ्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

केळीचे नुकसान, गहूही झाला आडवा

कठोरा, भादली, भोकर या भागात जोरदार वादळासह झालेल्या पावसात केळीच्या कांदेबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये केळीचे घड उन्मळून पडले आहेत. दापोरा परिसरातदेखील केळीचे नुकसान झाले आहे. वडली, शिरसोली परिसरातदेखील रबीच्या गहू व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. गाढोदा, पळसोद भागातही रबीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा तापी व गिरणा नदीच्या मध्ये येणाऱ्या आमोदा, सावखेडा, कठोरा या भागात बसला आहे.

अजून दोन दिवस अवकाळीचे सावट

जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ तारखेपर्यंत सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात गहू, हरभरा व मका काढण्याचा स्थिती आले आहेत. अशावेळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

रात्रीच्या वेळेस सुमारे एक ते दोन तास झालेल्या वादळात महावितरणचेही पितळ उघडे पडले आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर तालुक्यातील निम्म्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शिरसोली, आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता, तर कानळदा, नांदगाव भागातदेखील रात्रभर विजेचा लपंडाव सुरूच होता.