शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बळीराजा तयार झाला असून, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बळीराजा तयार झाला असून, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कापसावर दरवर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून हंगामपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. तसेच कापूस लागवडीसाठी आवश्यक बियाणेदेखील एक जूननंतरच शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. जळगाव, चोपडा, धरणगाव, यावल या तालुक्यांमध्ये सर्वाधिक लागवड झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून हंगामपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन केले जात असले तरी पूर्ण हंगामात तीन पिके घेता यावीत, यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व कापूस लागवडीवर भर दिला जातो.

१० जूनपर्यंत जिल्ह्यात होणार मान्सूनचे आगमन

जिल्ह्यात दरवर्षी सात जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता निर्माण होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होत असते. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले होते. त्यामुळे जून महिन्यातच जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी १० जूनपर्यंत जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात दोन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा अंदाज स्कायमेट या हवामान खात्याने वर्तवला, पावसाचे आगमन झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.

धूळ पेरणीचे क्षेत्र झाले कमी

कृषी विभागाकडून दरवर्षी धूळपेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जात असते. मान्सूनचे उशिरा होणारे आगमन यामुळे दुबार पेरणीचे निर्माण होणारे संकट, या कारणासाठी आता जिल्ह्यात धूळपेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आधी धरणगाव अमळनेर तालुक्यात धूळपेरणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, आता केवळ पंधरा ते वीस हेक्टर क्षेत्रावर धूळपेरणी होत असल्याचे समोर आले आहे. धरणगाव तालुक्यातील रेल, लाडली, दोनगाव या परिसरातच आता जेमतेम धूळपेरणी होत असते.