शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाणे येथील दंगल पूर्वनियोजित

By admin | Updated: June 8, 2017 11:13 IST

गुर्जर समाजाला लक्ष करण्याचा आरोप : दोडे गुर्जर समाज संघटनाकडून प्रशासनास निवेदन

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.8- तालुक्यातील आव्हाणे येथे रविवारी रात्री दोन गटात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. एका गटाकडून जळगाव शहरातून सुमारे पाचशे गुंडाना बोलावून गावातील दुस:या गटावर हल्ला करण्याचा प्रय} करण्यात आला असल्याचा आरोप दोडे गुर्जर समाज संघाटनाकडून करण्यात आला आहे. आव्हाणे येथे रविवारी झालेल्या दंगलीत बाहेर गावाहून आलेल्या गुंडावर कारवाईची मागणी गुर्जर समाज संघटनांकडून करण्यात आली असून यासंबधी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, आव्हाण्याचे माजी उपसरपंच बबन वामन चौधरी, मुरलीधर मोहन पाटील, अॅड.हेमंत चौधरी, शिवसेनेचे भगवान पाटील, साहेबराव पाटील, रवींद्र चौधरी, अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे पदाधिकारी राकेश पाटील, नवलसिंग पाटील, श्रीराम पाटील, संदीप चौधरी, सचिन चौधरी, भूषण पाटील, किरण पाटील, दीपक पाटील, रावसाहेब चौधरी, हर्षल पाटील, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. 
या निवेदनात म्हटले होते की, गावात रविवारी झालेले भांडण किरकोळ स्वरुपाचे होते, मात्र समोरच्या गटाकडून गुंड प्रवृत्तीचे लोकांना हत्यारासह बोलावून गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रय} केला. किरकोळ भांडण झाल्यानंतर लगेच जळगावहून पाचशे लोकांचा जमाव हत्यारासह गावात कसा आला? असा प्रश्न या निवेदनातून उपस्थित केला आहे. तसेच बाहेरून आलेल्या गुंडानी आव्हाणे ग्रामस्थांसोबतच पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजीत स्वरुपाचा होता, या हल्लय़ातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 
या दंगलीदरम्यान गावात आलेल्या गुंडावर पोलीस प्रशासनाने वेळेवर आवर घातल्यामुळे गावात होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई केली नसती तर एका गटावर मोठा हल्ला झाला असता. त्यामुळे जळगाव पोलिसांचे या निवेदनात अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच समोरच्या गटाकडून नेहमी अॅट्रोसीटी कायद्याचा वापर करण्याची धमकी दिली जात असून अनेकवेळा खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. गुर्जर समाज शांतताप्रिय समाज असून, गावातील इतर अल्पसंख्याक समाजाशी नेहमी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. मात्र या शांतीचा गैरफायदा एका समाजाकडून घेतला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.