शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आव्हाणे येथील दंगल पूर्वनियोजित

By admin | Updated: June 8, 2017 11:13 IST

गुर्जर समाजाला लक्ष करण्याचा आरोप : दोडे गुर्जर समाज संघटनाकडून प्रशासनास निवेदन

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.8- तालुक्यातील आव्हाणे येथे रविवारी रात्री दोन गटात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. एका गटाकडून जळगाव शहरातून सुमारे पाचशे गुंडाना बोलावून गावातील दुस:या गटावर हल्ला करण्याचा प्रय} करण्यात आला असल्याचा आरोप दोडे गुर्जर समाज संघाटनाकडून करण्यात आला आहे. आव्हाणे येथे रविवारी झालेल्या दंगलीत बाहेर गावाहून आलेल्या गुंडावर कारवाईची मागणी गुर्जर समाज संघटनांकडून करण्यात आली असून यासंबधी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, आव्हाण्याचे माजी उपसरपंच बबन वामन चौधरी, मुरलीधर मोहन पाटील, अॅड.हेमंत चौधरी, शिवसेनेचे भगवान पाटील, साहेबराव पाटील, रवींद्र चौधरी, अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे पदाधिकारी राकेश पाटील, नवलसिंग पाटील, श्रीराम पाटील, संदीप चौधरी, सचिन चौधरी, भूषण पाटील, किरण पाटील, दीपक पाटील, रावसाहेब चौधरी, हर्षल पाटील, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. 
या निवेदनात म्हटले होते की, गावात रविवारी झालेले भांडण किरकोळ स्वरुपाचे होते, मात्र समोरच्या गटाकडून गुंड प्रवृत्तीचे लोकांना हत्यारासह बोलावून गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रय} केला. किरकोळ भांडण झाल्यानंतर लगेच जळगावहून पाचशे लोकांचा जमाव हत्यारासह गावात कसा आला? असा प्रश्न या निवेदनातून उपस्थित केला आहे. तसेच बाहेरून आलेल्या गुंडानी आव्हाणे ग्रामस्थांसोबतच पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजीत स्वरुपाचा होता, या हल्लय़ातील दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 
या दंगलीदरम्यान गावात आलेल्या गुंडावर पोलीस प्रशासनाने वेळेवर आवर घातल्यामुळे गावात होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई केली नसती तर एका गटावर मोठा हल्ला झाला असता. त्यामुळे जळगाव पोलिसांचे या निवेदनात अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच समोरच्या गटाकडून नेहमी अॅट्रोसीटी कायद्याचा वापर करण्याची धमकी दिली जात असून अनेकवेळा खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. गुर्जर समाज शांतताप्रिय समाज असून, गावातील इतर अल्पसंख्याक समाजाशी नेहमी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. मात्र या शांतीचा गैरफायदा एका समाजाकडून घेतला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.