शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पूरहानी निधीत राजकारण

By admin | Updated: July 29, 2014 13:43 IST

जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी.

 

जळगाव : जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी. आता या निधीत आपापली कामे घुसविण्यावरून सदस्यांमध्ये वाद होत आहेत. 
दुसर्‍या बाजूला मर्जीतल्या ठेकेदारांची कामे मार्गी लावून देण्याची सुपारी अधिकार्‍यांनी घेतल्याने अधिकचा गोंधळ सुरू आहे. 
गेल्या आर्थिक वर्षामध्येच हा निधी खर्च व्हायला हवा होता, पण जि.प.ने नियोजन करून निधी खर्च केला नाही. मध्यंतरी बांधकाम विभागामध्ये या निधीत आपल्या गटातील काम डावलले म्हणून विरोधी गटातील सदस्य आर.जी.पाटील व माजी जि.प.सदस्य वसंत महाजन यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आराखडा तयार करताना आपल्या गटातील कामे घेतली व आता खर्चाचे नियोजन करताना ती का घेतली जात नाही, असा सवाल त्यांनी केला होता. 
बांधकाम समिती, स्थायी समिती व जि.प.अध्यक्षांच्या शिफारसी या पूरहानी निधीच्या नियोजनामध्ये अग्रभागी ठेवल्या गेल्या आहेत. जे सदस्य मितभाषी आहेत, त्यांच्या गटातील रस्ते दुरुस्तीसाठी छदामही दिला जाणार नाही, अशीही योजना आहे. जामनेर तालुक्यातील अनेक कामे घुसविण्यात आल्याने विरोधी गटातील सदस्यांमध्ये अधिकची नाराजी आहे.
----------
प्रशासकीय मान्यता दिल्या, पण शिफारसींसाठी या निधीतून करावयाच्या कामांसंबंधीच्या शिफारशींची फाईल अतिरिक्त सीईओंकडे आठ दिवसांपासून अडकली आहे. फक्त ठेकेदाराच्या इंटरेस्टचे विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरू आहे.या तणातणी व वादात गेल्या वर्षी खर्च करावयाचा हा निधी अजूनही खर्च झालेला नाही. यामुळे या वर्षाचे पूरहानी निधीसंबंधीच्या मागणीचे प्रस्ताव तयार होऊ शकत नाही. याचा अर्थ सत्तेच्या व मर्जीच्या राजकारणामुळे खर्‍या अर्थाने आवश्यक असलेल्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती मात्र झालेली नाही. ज्या सदस्यांच्या गटामधील गावांचे रस्ते खरोखरच खराब झाले आहेत त्या भागातील काम मंजूर झालेच पाहिजे. -आर.जी.पाटील, जि.प.सदस्य 
 
बांधकाम समितीने विरोधी गटातील सदस्यांची अधिकाधिक कामे घ्यावी, अशा पद्धतीने आराखडा तयार केला. तसेच ज्या भागातील रस्ते दुरुस्तीची गरज अधिक आहे त्या भागाचा आराखड्यात समावेश आहे.  -मच्छिंद्र पाटील, जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती, बांधकाम समिती