शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पूरहानी निधीत राजकारण

By admin | Updated: July 29, 2014 13:43 IST

जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी.

 

जळगाव : जिल्हाभरात २0१३ च्या अतवृष्टीमुळे अनेक जि.प.सदस्यांच्या गटांमधील रस्ते खराब झाले. त्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून जि.प.ने ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला, पण मिळाले फक्त पाच कोटी. आता या निधीत आपापली कामे घुसविण्यावरून सदस्यांमध्ये वाद होत आहेत. 
दुसर्‍या बाजूला मर्जीतल्या ठेकेदारांची कामे मार्गी लावून देण्याची सुपारी अधिकार्‍यांनी घेतल्याने अधिकचा गोंधळ सुरू आहे. 
गेल्या आर्थिक वर्षामध्येच हा निधी खर्च व्हायला हवा होता, पण जि.प.ने नियोजन करून निधी खर्च केला नाही. मध्यंतरी बांधकाम विभागामध्ये या निधीत आपल्या गटातील काम डावलले म्हणून विरोधी गटातील सदस्य आर.जी.पाटील व माजी जि.प.सदस्य वसंत महाजन यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आराखडा तयार करताना आपल्या गटातील कामे घेतली व आता खर्चाचे नियोजन करताना ती का घेतली जात नाही, असा सवाल त्यांनी केला होता. 
बांधकाम समिती, स्थायी समिती व जि.प.अध्यक्षांच्या शिफारसी या पूरहानी निधीच्या नियोजनामध्ये अग्रभागी ठेवल्या गेल्या आहेत. जे सदस्य मितभाषी आहेत, त्यांच्या गटातील रस्ते दुरुस्तीसाठी छदामही दिला जाणार नाही, अशीही योजना आहे. जामनेर तालुक्यातील अनेक कामे घुसविण्यात आल्याने विरोधी गटातील सदस्यांमध्ये अधिकची नाराजी आहे.
----------
प्रशासकीय मान्यता दिल्या, पण शिफारसींसाठी या निधीतून करावयाच्या कामांसंबंधीच्या शिफारशींची फाईल अतिरिक्त सीईओंकडे आठ दिवसांपासून अडकली आहे. फक्त ठेकेदाराच्या इंटरेस्टचे विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरू आहे.या तणातणी व वादात गेल्या वर्षी खर्च करावयाचा हा निधी अजूनही खर्च झालेला नाही. यामुळे या वर्षाचे पूरहानी निधीसंबंधीच्या मागणीचे प्रस्ताव तयार होऊ शकत नाही. याचा अर्थ सत्तेच्या व मर्जीच्या राजकारणामुळे खर्‍या अर्थाने आवश्यक असलेल्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती मात्र झालेली नाही. ज्या सदस्यांच्या गटामधील गावांचे रस्ते खरोखरच खराब झाले आहेत त्या भागातील काम मंजूर झालेच पाहिजे. -आर.जी.पाटील, जि.प.सदस्य 
 
बांधकाम समितीने विरोधी गटातील सदस्यांची अधिकाधिक कामे घ्यावी, अशा पद्धतीने आराखडा तयार केला. तसेच ज्या भागातील रस्ते दुरुस्तीची गरज अधिक आहे त्या भागाचा आराखड्यात समावेश आहे.  -मच्छिंद्र पाटील, जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती, बांधकाम समिती