शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

लग्नाच्या जेवणावळीत ५० हजारांच्या दंडाचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र नागरिकांकडून पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या चुका केल्या जात आहेत. लग्न समारंभामध्ये पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. शहरातील मेहरुण व रामेश्वर कॉलनीमधील लग्न समारंभामध्ये झालेल्या गर्दीमुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी वधू-वर पित्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभामध्ये ५० पेक्षा अधिक नागरिकांना सहभागी होण्यास बंदी घातली आहे. मात्र सोमवारी शहरातील रामेश्वर कॉलनी व मेहरुण परिसरात दोन लग्न समारंभांचे आयोजन केले होते. या दोन्ही लग्न समारंभांमध्ये १०० हून अधिक नागरिक सहभागी झाल्याचे मनपा पथकाने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे मनपा उपायुक्तांनी याबाबत वधू-वर पित्याला मंगळवारी नोटीस बजावली आहे.

प्रत्येकी ५० हजार रुपयांचा ठोठावला दंड, बजावली कारणे दाखवा नोटीस

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनी भागातील युवराज चिंधु रायसिंगे यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, याबाबतची नोटीस त्यांना पाठविण्यात आली आहे. यासह मेहरुण परिसरातील हनुमाननगर भागातील भास्कर रतन माळी यांनादेखील ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून, नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाकडून लग्न समारंभाबाबत आतापर्यंत करण्यात आलेली ही अकरावी कारवाई आहे. दरम्यान, सोमवारीच याबाबत मनपाच्या पथकाने लग्न समारंभामध्ये जाऊन व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

सहा दुकाने सील

मनपा प्रशासनाकडून मंगळवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या सहा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकाने सील करण्यात आली आहेत. मनपा प्रशासनाकडून आतापर्यंत शहरातील ५०० हून अधिक दुकाने सील करण्यात आली आहेत.

हरी विठ्ठल भागातील बाजार हटवला

मंगळवारी शहरातील हरी विठ्ठलनगर भागातील भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजार मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उठवून लावला. सकाळीच महापालिकेचे पथक या भागात दाखल झाले होते. तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटण्याच्या आधीच मनपाच्या पथकाने विक्रेत्यांना या ठिकाणावरून हटवले.