शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘प्रहार’नेही वेधले पाण्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

नगरपंचायतीची स्थापना २०१७ अखेर झाली असून जवळपास ४ वर्षे उलटून मुक्ताईनगच्या नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाद्वारे अत्यावश्यक सोयीसुविधांचा लाभ होत ...

नगरपंचायतीची स्थापना २०१७ अखेर झाली असून जवळपास ४ वर्षे उलटून मुक्ताईनगच्या नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाद्वारे अत्यावश्यक सोयीसुविधांचा लाभ होत नसून फक्त नगरपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी पार पाडण्यात नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. असा आरोप या संघटनेने केला आहे.

जुनीच पाणीपुरवठा यंत्रणा

येथे जी पाणीपुरवठा यंत्रणा ग्रामपंचायत काळात होती तीच यंत्रणा नगरपंचायत काळात वापरण्यात येत आहे. त्यात काहीही सुधारणा करण्यात आली नाही. जीर्ण पाण्याची टाकी नगरपंचायत प्रशासनाकडून वापरण्यात येत आहे. या टाकीचा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे पडलेला आहे. त्यावर केवळ पत्रे टाकण्यात आलेले आहेत.

शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये येणाऱ्या पाण्याला भयंकर दुर्गंधी सुद्धा येत असते. अशा भयावह परिस्थितीमध्ये जे पाणी जनावरे सुध्दा पीत नाहीत ते पाणी शहरवासीयांना पुरवले जात आहे . शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये व्हॉल्वमध्ये गटारीचे पाणी पाझरत आहे. प्रशासन वारंवार तक्रारींनंतरही सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे. तरी तत्काळ शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ‘प्रहार’ ने केली असून मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे, विलास पांडे ,चंद्रकांत वंजारी, संतोष राजपूत, संदीप इंगळे, अनिकेत सोनार, हृषिकेश पाटील , बापू मेढे, उत्तम जुमळे यांनी दिला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, लहुजी क्रांती सेना आदींनी समर्थन दिले आहे.

190721\img-20210719-wa0076.jpg

पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन करताना डॉ विवेक सोनवणे,विलास पांडे ,चंद्रकांत वंजारी ,संतोष राजपूत ,संदीप इंगळे ,