शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जाणता राजा नगरात ३० तासांनी झाला वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा नगरातही दीड दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात महावितरणचे अधिकारी-कर्मचारी फोन घेत नसल्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

महावितरणतर्फे शहरात सध्या पावसाळीपूर्व कामे सुरू असल्याने, दररोज विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यात रविवारच्या अवकाळी पावसामुळे पुन्हा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. विशेषतः जाणता राजा नगरात रविवारी पहाटेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीस तासांनी सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना रविवारची रात्र अंधारात काढावी लागली. या भागात तांत्रिक बिघाड सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मात्र, या भागातील महावितरणचे वायरमन व अभियंते फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर एखादा अनुचित प्रकार घडला आणि त्या वेळेस महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

रविवारी पहाटेपासून या भागात वीज नव्हती. यामुळे उकाड्याचा त्रास होऊन, याचा आरोग्यावरही परिणाम झाला. त्यात महावितरणचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने, वीज गेल्यावर आम्हाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो.

तुषार कुमावत, रहिवासी

या भागात दोन दिवस वीज नसल्याने खूप त्रास झाला. रविवारी रात्रीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली. वीज कधी येणार, याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांची यामुळे खूप गैरसोय होते. तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निरंजन मोरिया, रहिवासी

रविवारी झालेल्या पावसामुळे मुख्य विजेवरच बिघाड झाला होता. हा बिघाड लवकर सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. तसेच अनेक ठिकाणी ब्रेकडाउन झाल्यामुळे आमचे कर्मचारी लवकर वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामात व्यस्त होते. विजेबाबत ग्राहकांचे फोन आल्यावर त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या.

समीर निगडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण