शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जाणता राजा नगरात ३० तासांनी झाला वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा नगरातही दीड दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात महावितरणचे अधिकारी-कर्मचारी फोन घेत नसल्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

महावितरणतर्फे शहरात सध्या पावसाळीपूर्व कामे सुरू असल्याने, दररोज विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यात रविवारच्या अवकाळी पावसामुळे पुन्हा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. विशेषतः जाणता राजा नगरात रविवारी पहाटेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीस तासांनी सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना रविवारची रात्र अंधारात काढावी लागली. या भागात तांत्रिक बिघाड सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मात्र, या भागातील महावितरणचे वायरमन व अभियंते फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर एखादा अनुचित प्रकार घडला आणि त्या वेळेस महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

रविवारी पहाटेपासून या भागात वीज नव्हती. यामुळे उकाड्याचा त्रास होऊन, याचा आरोग्यावरही परिणाम झाला. त्यात महावितरणचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने, वीज गेल्यावर आम्हाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो.

तुषार कुमावत, रहिवासी

या भागात दोन दिवस वीज नसल्याने खूप त्रास झाला. रविवारी रात्रीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली. वीज कधी येणार, याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांची यामुळे खूप गैरसोय होते. तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निरंजन मोरिया, रहिवासी

रविवारी झालेल्या पावसामुळे मुख्य विजेवरच बिघाड झाला होता. हा बिघाड लवकर सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. तसेच अनेक ठिकाणी ब्रेकडाउन झाल्यामुळे आमचे कर्मचारी लवकर वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामात व्यस्त होते. विजेबाबत ग्राहकांचे फोन आल्यावर त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या.

समीर निगडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण