शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जाणता राजा नगरात ३० तासांनी झाला वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला असताना, कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा नगरातही दीड दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यात महावितरणचे अधिकारी-कर्मचारी फोन घेत नसल्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

महावितरणतर्फे शहरात सध्या पावसाळीपूर्व कामे सुरू असल्याने, दररोज विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यात रविवारच्या अवकाळी पावसामुळे पुन्हा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. विशेषतः जाणता राजा नगरात रविवारी पहाटेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीस तासांनी सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना रविवारची रात्र अंधारात काढावी लागली. या भागात तांत्रिक बिघाड सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मात्र, या भागातील महावितरणचे वायरमन व अभियंते फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जर एखादा अनुचित प्रकार घडला आणि त्या वेळेस महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

रविवारी पहाटेपासून या भागात वीज नव्हती. यामुळे उकाड्याचा त्रास होऊन, याचा आरोग्यावरही परिणाम झाला. त्यात महावितरणचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने, वीज गेल्यावर आम्हाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो.

तुषार कुमावत, रहिवासी

या भागात दोन दिवस वीज नसल्याने खूप त्रास झाला. रविवारी रात्रीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली. वीज कधी येणार, याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नसल्याने नागरिकांची यामुळे खूप गैरसोय होते. तरी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

निरंजन मोरिया, रहिवासी

रविवारी झालेल्या पावसामुळे मुख्य विजेवरच बिघाड झाला होता. हा बिघाड लवकर सापडत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. तसेच अनेक ठिकाणी ब्रेकडाउन झाल्यामुळे आमचे कर्मचारी लवकर वीजपुरवठा सुरू करण्याच्या कामात व्यस्त होते. विजेबाबत ग्राहकांचे फोन आल्यावर त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या.

समीर निगडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण