शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

By admin | Updated: October 3, 2015 00:19 IST

नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊटचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गांधी जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली.

जळगाव : विजेचा वापर कमी व्हावा व त्याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन व्हाव़े शेतक:यांना वीज उपलब्ध व्हावी़ राष्ट्रभक्तीला हातभार लागावा यासाठी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांनी आपल्या वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊट (विजेचा वापर बंद) करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली आणि उपक्रमात सहभागी होणाचा संकल्प केला.

यावेळी महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, महावितरणचे मुख्य अभियंता ज़ेएम़ पारधी, आस्थापना प्रमुख राजेंद्र म्हंकाळे, विनोद देशमुख उपस्थित होत़े रामदास मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला़

संपूर्ण शहरात राबविणार उपक्रम

या संकल्पनेचा नागरिकांमध्ये प्रचार आणि प्रसार होईल, तसतसा हा उपक्रम संपूर्ण शहरातही राबविला जाणार असल्याची माहिती नगरसेविका देशमुख यांनी दिली़ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रसेवेला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आह़े

या भागात राबविला जाणार उपक्रम

महाबळ परिसरात हा उपक्रम शुक्रवारपासून राबविण्यास सुरुवात झाली़ त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र बँक कॉलनी, नेहरू नगर, मोहन नगर आणि संभाजी नगर परिसरात हा उपक्रम राबविला जात आह़े 100 ते 150 कुटुंबीयांनी यात सहभाग घेतला़

600 ते 700 रुपयांची प्रतिदिन होणार वीज बचत

वार्ड क्रमांक 36 मध्ये 1 हजार 200 ते 1 हजार 300 घरे आहेत़ पैकी 150 कुटुंबीयांनी बचतीची शपथ घेतली आह़े त्यांच्याकडून अर्धातास ब्लॅक आऊट करण्यात आल्यास प्रतिदिन त्यांच्याकडून जवळपास 600 ते 700 रुपयांची वीज बचत होईल़ महिनाभरात 18 हजार रुपयांची वीज त्यांच्याकडून बचत केली जाऊ शकत़े 10 हजार नागरिक यात सहभागी झाल्यास प्रतिदिन जवळपास 40 हजारांच्या विजेची त्यांच्याकडून बचत शक्य असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एऩबी़ चौधरी यांनी सांगितल़े

सर्वप्रथम या भागातील रहिवाशांना अश्विनी व विनोद देशमुख यांनी समजून सांगितली. त्यांना हा उपक्रम आवडल्याने त्यांनी होकार दिल्याने गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

अशी आहे संकल्पना

दररोज रात्री 8 ते 8़30 र्पयत घरातील विद्युत पुरवठा बंद ठेवून अर्धातास फक्त कुटुंबासोबत घालवायचा

यामुळे कुटुंबातील सदस्यांचा तुटलेला संवाद पुन्हा जुळून येईल आणि नातेसंबंध दृढ होतील

विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल़ परिणामी वीज बिलही कमी होईल़ अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रसेवेला नागरिकांचा हातभार लागेल़

वीज शिल्लक राहिल्यास ती शेतक:यांना पुरविली जाईल़ यामुळे कृषि उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध होतील़