शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात ...

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, महिना उलटूनही हा निधी वर्ग करण्याबाबत जिल्हा प्रशासन अथवा मनपा प्रशासनाकडून अद्याप महावितरणकडे निधी वर्ग न केल्यामुळे, विद्युत खांब हटविण्याचे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. त्यामुळे महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही, हे काम सध्या ५० टक्केच पूर्ण झाले आहे. तर पुलाचे जिल्हा परिषदेच्या बाजूने बाहेरील काम वर्षभरापासून बंद आहे. या ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब व उच्च क्षमतेच्या विद्युत लाईनचा अडथळा असल्याने हे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. विद्युत खांब हटविण्यासाठी मनपा अथवा जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे, गेल्या महिन्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मनपाच्या शिल्लक असलेल्या साडेचार कोटींच्या निधीतून दीड कोटींचा निधी खांब हटविण्यासाठी महावितरणला देण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.

मात्र, महिना उलटूनही महावितरणकडे हा निधी वर्ग झालेला नाही. महावितरण प्रशासनाने खांब हटविण्यासाठी गेल्या वर्षीच निविदा प्रक्रिया राबविली असून, नियुक्त केलेल्या मक्तेदारामार्फतच हे काम केले जाणार आहे. मात्र, नियमानुसार संबंधित मक्तेदाराला कामाची वर्क आर्डर देण्यासाठी महावितरणकडे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे, ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून निधी मिळाल्यावरच खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

पुलाची वाढीव मुदत दोन महिन्यात संपणार

कोरोनामुळे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे गेल्यावर्षी मधल्या काळात अनेक महिने काम बंद होते. यामुळे पुलाच्या कामाला अधिकच विलंब झाला. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फेब्रुवारीत पुलाची मुदत संपल्यानंतर, आणखी सहा महिने मुदत वाढ देऊन, ही मुदतवाढ आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मात्र, अद्यापही पुलाचे काम म्हणावे तसे प्रगतीपथावर नसल्याने, या वर्षांतदेखील पुलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.