शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात ...

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, महिना उलटूनही हा निधी वर्ग करण्याबाबत जिल्हा प्रशासन अथवा मनपा प्रशासनाकडून अद्याप महावितरणकडे निधी वर्ग न केल्यामुळे, विद्युत खांब हटविण्याचे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. त्यामुळे महावितरणला निधी मिळाल्यावरच विद्युत खांब हटविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही, हे काम सध्या ५० टक्केच पूर्ण झाले आहे. तर पुलाचे जिल्हा परिषदेच्या बाजूने बाहेरील काम वर्षभरापासून बंद आहे. या ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब व उच्च क्षमतेच्या विद्युत लाईनचा अडथळा असल्याने हे काम दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. विद्युत खांब हटविण्यासाठी मनपा अथवा जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे, गेल्या महिन्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मनपाच्या शिल्लक असलेल्या साडेचार कोटींच्या निधीतून दीड कोटींचा निधी खांब हटविण्यासाठी महावितरणला देण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.

मात्र, महिना उलटूनही महावितरणकडे हा निधी वर्ग झालेला नाही. महावितरण प्रशासनाने खांब हटविण्यासाठी गेल्या वर्षीच निविदा प्रक्रिया राबविली असून, नियुक्त केलेल्या मक्तेदारामार्फतच हे काम केले जाणार आहे. मात्र, नियमानुसार संबंधित मक्तेदाराला कामाची वर्क आर्डर देण्यासाठी महावितरणकडे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे, ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून निधी मिळाल्यावरच खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

पुलाची वाढीव मुदत दोन महिन्यात संपणार

कोरोनामुळे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे गेल्यावर्षी मधल्या काळात अनेक महिने काम बंद होते. यामुळे पुलाच्या कामाला अधिकच विलंब झाला. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फेब्रुवारीत पुलाची मुदत संपल्यानंतर, आणखी सहा महिने मुदत वाढ देऊन, ही मुदतवाढ आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मात्र, अद्यापही पुलाचे काम म्हणावे तसे प्रगतीपथावर नसल्याने, या वर्षांतदेखील पुलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.