शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर ...

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर आता वादळी-वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. विशेष म्हणजे, पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील वाघनगर, खेडी परिसर, जुने जळगाव, शनीपेठ, कांचननगर, पिंप्राळा, तसेच आव्हाणे, शिरसोली, रायपूर, असोदा या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर शिरसोली येथे ३० तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर असाच प्रकार एमआयडीसीतील घडला. अशा प्रकारे शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात दर दिवसाआड वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घडत आहे, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यावर शहरातील ठिकठिकाणचे महावितरणच्या कार्यालयांमधील कर्मचारी नागरिकांचे फोनही घेत नसल्यामुळे, नागरिकांमधून शहर महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

अधिकारी म्हणतात, फक्त शनिवारीच होतो वीजपुरवठा खंडित

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना, दुसरी शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी मात्र शहरात कुठेही वीजपुरवठा खंडित होत नसल्याचा दावा केला, तर फक्त शनिवारीच महावितरणतर्फे विविध ठिकाणचे तांत्रिक कामे हाती घेतली जातात. त्यामुळे आठवड्यातून फक्त शनिवारीच वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत, माझ्यापर्यंत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येत नसल्याचे सांगितले. मात्र, कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित झाल्यावर फोनच उचलण्यात येत नसल्यामुळे, वीजपुरवठा खंडित होण्याची तक्रार कशी समजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

सहा महिन्यांपासून शहराचा कारभार ‘प्रभारी’अभियंत्यांवर :

जळगाव शहराचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय तडवी यांची सहा महिन्यांपूर्वी मनमाडला बदली झाल्यानंतर, महावितरणतर्फे त्यांच्या रिक्त जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराचा महावितरणचा कारभार प्रभारी अभियंता म्हणून एन.बी. चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. तडवी यांची बदली झाल्यापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, चौधरी यांच्या जागी महावितरणने पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.