शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर ...

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर आता वादळी-वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. विशेष म्हणजे, पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील वाघनगर, खेडी परिसर, जुने जळगाव, शनीपेठ, कांचननगर, पिंप्राळा, तसेच आव्हाणे, शिरसोली, रायपूर, असोदा या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर शिरसोली येथे ३० तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर असाच प्रकार एमआयडीसीतील घडला. अशा प्रकारे शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात दर दिवसाआड वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घडत आहे, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यावर शहरातील ठिकठिकाणचे महावितरणच्या कार्यालयांमधील कर्मचारी नागरिकांचे फोनही घेत नसल्यामुळे, नागरिकांमधून शहर महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

अधिकारी म्हणतात, फक्त शनिवारीच होतो वीजपुरवठा खंडित

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना, दुसरी शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी मात्र शहरात कुठेही वीजपुरवठा खंडित होत नसल्याचा दावा केला, तर फक्त शनिवारीच महावितरणतर्फे विविध ठिकाणचे तांत्रिक कामे हाती घेतली जातात. त्यामुळे आठवड्यातून फक्त शनिवारीच वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत, माझ्यापर्यंत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येत नसल्याचे सांगितले. मात्र, कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित झाल्यावर फोनच उचलण्यात येत नसल्यामुळे, वीजपुरवठा खंडित होण्याची तक्रार कशी समजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

सहा महिन्यांपासून शहराचा कारभार ‘प्रभारी’अभियंत्यांवर :

जळगाव शहराचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय तडवी यांची सहा महिन्यांपूर्वी मनमाडला बदली झाल्यानंतर, महावितरणतर्फे त्यांच्या रिक्त जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराचा महावितरणचा कारभार प्रभारी अभियंता म्हणून एन.बी. चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. तडवी यांची बदली झाल्यापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, चौधरी यांच्या जागी महावितरणने पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.