शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पावसाळापूर्व कामे झाल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर ...

गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर, सुरुवातीला असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे दररोज तासन् तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर आता वादळी-वाऱ्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. विशेष म्हणजे, पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील वाघनगर, खेडी परिसर, जुने जळगाव, शनीपेठ, कांचननगर, पिंप्राळा, तसेच आव्हाणे, शिरसोली, रायपूर, असोदा या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तर शिरसोली येथे ३० तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर असाच प्रकार एमआयडीसीतील घडला. अशा प्रकारे शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात दर दिवसाआड वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घडत आहे, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यावर शहरातील ठिकठिकाणचे महावितरणच्या कार्यालयांमधील कर्मचारी नागरिकांचे फोनही घेत नसल्यामुळे, नागरिकांमधून शहर महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

अधिकारी म्हणतात, फक्त शनिवारीच होतो वीजपुरवठा खंडित

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना, दुसरी शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी मात्र शहरात कुठेही वीजपुरवठा खंडित होत नसल्याचा दावा केला, तर फक्त शनिवारीच महावितरणतर्फे विविध ठिकाणचे तांत्रिक कामे हाती घेतली जातात. त्यामुळे आठवड्यातून फक्त शनिवारीच वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगत, माझ्यापर्यंत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येत नसल्याचे सांगितले. मात्र, कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित झाल्यावर फोनच उचलण्यात येत नसल्यामुळे, वीजपुरवठा खंडित होण्याची तक्रार कशी समजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

सहा महिन्यांपासून शहराचा कारभार ‘प्रभारी’अभियंत्यांवर :

जळगाव शहराचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय तडवी यांची सहा महिन्यांपूर्वी मनमाडला बदली झाल्यानंतर, महावितरणतर्फे त्यांच्या रिक्त जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराचा महावितरणचा कारभार प्रभारी अभियंता म्हणून एन.बी. चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. तडवी यांची बदली झाल्यापासून विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, चौधरी यांच्या जागी महावितरणने पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.