शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

सत्ताधा:यांची शंभरी, भुसावळ शहराचा विकास मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 11:02 IST

भुसावळात सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े

 ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ  

भुसावळ, दि.19 - देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, सबके के साथ सबका विकास, एक हाती सत्ता द्या, बदल घडवू, अशा आश्वासनांच्या जोरावर भुसावळ पालिकेत अनेक वर्षानंतर सत्तांतर घडल़े माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत भुसावळात इतिहास घडवला. मात्र, सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े
निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा शहरवासीयांना अनुभव येत आह़े रस्त्यांची समस्या जैसे थे आहे, अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी, शहरभर कचरा साचला आहे, पथदिवे बंद आहेत हे चित्र सत्तांतरानंतरही बदलले नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आह़े
विकासाच्या नुसत्याच गप्पाच
शहरातील सर्वाधिक मोठी स्वच्छतेची समस्या आह़े शहरातील प्रत्येक भागात कचरा नुसताच तुंबला नाही, तर ओसंडून वाहत असल्याचे चित्र आह़े आहे त्या कचराकुंडय़ा तुटल्या आहेत, तर काही भागात कचराकुंडय़ाच नाही. त्यामुळे महिला गटारीत कचरा फेकत असल्याने गटारी तुंबल्या आहेत़  
अशुद्ध पाणीपुरवठा
शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आह़े जलशुद्धीकरणाचा प्लँट ब्रिटिशकालीन आह़े अटल योजनेत शहराचा समावेश झाला असला, तरी प्रत्यक्षात योजना सुरू होण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत. त्यामुळे आहे त्या प्लँटमध्ये सुधारणा झाल्यास अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी कमी होणार आह़े
घंटागाडय़ांचे घोडे अडले कुठे?
राष्ट्रवादीच्या काळातील दोघा तत्कालीन नगराध्यक्षांनी 47 घंटागाडय़ा मंजूर झाल्याचे सुतोवाच करीत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मंजुरी मिळाल्याचेही सांगितले. मात्र घोडे अडले कुठे? असा प्रश्न आह़े घंटागाडय़ांची खरेदी झाली असती, तर  कच:याचा  प्रश्न सुटला असता़
रस्ते सोसताय घाव
शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते घाव सोसत आहेत़ नगरोत्थान योजनेत टाकलेल्या मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य अद्यापही उजळलेले नाही. ही योजनाच शहरासाठी रद्द झाली़ सर्वसाधारण रस्तेकामाला मंजुरी मिळाली मात्र कामाला सुरुवात नाही़ पावसाळ्यापूर्वीच  कामे न झाल्यास पुन्हा चार महिने प्रतीक्षाच आह़े
 
सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवस पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात कामकाजाचे दिवस आम्हाला कमीच मिळाले आहेत़ जुने सत्ताधारी एक महिना सत्तेवर राहिले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघ व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली़ त्यानंतर मुख्याधिकारी यांची प्रकृती बिघडल्याने ते सुटीवर गेल़े सर्वसाधारण बैठकीत 1 ते 24 प्रभागांतील विविध विकासाचे विषय घेतल़े दिलेल्या प्रत्येक आश्वासनांचे पालन होईल़
-रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ