शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा:यांची शंभरी, भुसावळ शहराचा विकास मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 11:02 IST

भुसावळात सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े

 ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ  

भुसावळ, दि.19 - देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, सबके के साथ सबका विकास, एक हाती सत्ता द्या, बदल घडवू, अशा आश्वासनांच्या जोरावर भुसावळ पालिकेत अनेक वर्षानंतर सत्तांतर घडल़े माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत भुसावळात इतिहास घडवला. मात्र, सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े
निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा शहरवासीयांना अनुभव येत आह़े रस्त्यांची समस्या जैसे थे आहे, अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी, शहरभर कचरा साचला आहे, पथदिवे बंद आहेत हे चित्र सत्तांतरानंतरही बदलले नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आह़े
विकासाच्या नुसत्याच गप्पाच
शहरातील सर्वाधिक मोठी स्वच्छतेची समस्या आह़े शहरातील प्रत्येक भागात कचरा नुसताच तुंबला नाही, तर ओसंडून वाहत असल्याचे चित्र आह़े आहे त्या कचराकुंडय़ा तुटल्या आहेत, तर काही भागात कचराकुंडय़ाच नाही. त्यामुळे महिला गटारीत कचरा फेकत असल्याने गटारी तुंबल्या आहेत़  
अशुद्ध पाणीपुरवठा
शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आह़े जलशुद्धीकरणाचा प्लँट ब्रिटिशकालीन आह़े अटल योजनेत शहराचा समावेश झाला असला, तरी प्रत्यक्षात योजना सुरू होण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत. त्यामुळे आहे त्या प्लँटमध्ये सुधारणा झाल्यास अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी कमी होणार आह़े
घंटागाडय़ांचे घोडे अडले कुठे?
राष्ट्रवादीच्या काळातील दोघा तत्कालीन नगराध्यक्षांनी 47 घंटागाडय़ा मंजूर झाल्याचे सुतोवाच करीत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मंजुरी मिळाल्याचेही सांगितले. मात्र घोडे अडले कुठे? असा प्रश्न आह़े घंटागाडय़ांची खरेदी झाली असती, तर  कच:याचा  प्रश्न सुटला असता़
रस्ते सोसताय घाव
शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते घाव सोसत आहेत़ नगरोत्थान योजनेत टाकलेल्या मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य अद्यापही उजळलेले नाही. ही योजनाच शहरासाठी रद्द झाली़ सर्वसाधारण रस्तेकामाला मंजुरी मिळाली मात्र कामाला सुरुवात नाही़ पावसाळ्यापूर्वीच  कामे न झाल्यास पुन्हा चार महिने प्रतीक्षाच आह़े
 
सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवस पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात कामकाजाचे दिवस आम्हाला कमीच मिळाले आहेत़ जुने सत्ताधारी एक महिना सत्तेवर राहिले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघ व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली़ त्यानंतर मुख्याधिकारी यांची प्रकृती बिघडल्याने ते सुटीवर गेल़े सर्वसाधारण बैठकीत 1 ते 24 प्रभागांतील विविध विकासाचे विषय घेतल़े दिलेल्या प्रत्येक आश्वासनांचे पालन होईल़
-रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ