शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्याच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या ...

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८ टक्के अर्थात एक टक्क्यापेक्षाही कमी नोंदविण्यात आला आहे. राज्यात केवळ तीनच जिल्हे हे एक टक्क्याच्या खाली असून, जळगाव त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या महिनाभरापासून समोर येत असून, अनलॉकच्या प्रक्रियेतही जिल्हा पहिल्या स्तरावरच कायम आहे. तपासण्यांवर अधिकाधिक भर देऊन रुग्णांना विलग करून, पुढील धोके टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे. मार्च, एप्रिलमध्ये जळगाव शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा थेट ५० टक्के नोंदविण्यात आला होता. तो आता एक ते दीड टक्क्यांवर आला आहे. २२ जूनच्या आठवडाभराच्या अहवालानुसार जिल्हाभरात ३७,७२७ तपासण्या झाल्या असून, त्यात ३०१ बाधित आढळून आले आहेत. पाॅझिटिव्हिटी नियंत्रणात असल्याने निर्बंधांच्या बाबतीत जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा दिवसेंदिवस अधिक सक्षम करण्यावर भर देत असून, आगामी तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा सज्ज असल्याचे आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. यात जीएमसीत दोन प्रकल्प असून, दहा प्रकल्प जिल्ह्यात विविध ठिकाणी उभे केले जात आहे. यासह मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन टँकही उभा राहात आहे. शिवाय खासगी कोविड रुग्णालयांनाही ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. शिवाय बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडवाढीबाबतही प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. सर्वच तालुक्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जळगाव शहरात मोठा दिलासा

रुग्णसंख्या व मृत्यूच्या बाबतीत गेल्या वीस दिवसांपासून विशेषत: शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. यात नियमित दहापेक्षा कमी रुग्ण समोर येत आहेत, तर वीस दिवसात तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मध्यंतरी दररोज सात ७ ते ८ मृत्यू नोंदविण्यात येत होते. ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या तीन दिवसात एक मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याचे समाधानकारक चित्र होते.

पॉझिटिव्हिटी रेट कमी असणे का असतो दिलासा?

पॉझिटिव्हिटी रेट अर्थात शंभर तपासण्यांमध्ये आढळून येणारे बाधितांचे प्रमाण होय. एकत्रित जिल्ह्यात मार्च, एप्रिलमध्ये हाच पॉझिटिव्हिटी रेट ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. याचा अर्थ त्यावेळी शंभर तपासण्यांमध्ये ३५ रुग्ण आढळून येत होते. हा दर आता ०.८ नोंदविण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे याचाच अर्थ की, कोरोना संसर्गाचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. दिवसाला आता ५० पेक्षाही कमी बाधित आढळून येत आहेत. दुसरीकडे चाचण्या पाच हजारांपेक्षा अधिक होत आहे. यामुळे पॉझिटिव्हिट रेट हा कमी असणे हा मोठा दिलासा असतो.

राज्यातील टॉप दहा जिल्हे

नांदेड : ०.२ टक्के.

जळगाव : ०.८ टक्के

परभणी : ०.९ टक्के

नागपूर : १. ० टक्के

वर्धा : १.१ टक्के

हिंगोली १.२ टक्के

भंडारा : १.३ टक्के

चंद्रपूर : १.३ टक्के

नंदुरबार : १.६ टक्के

अमरावती : १.७ टक्के