शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्याच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या ...

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८ टक्के अर्थात एक टक्क्यापेक्षाही कमी नोंदविण्यात आला आहे. राज्यात केवळ तीनच जिल्हे हे एक टक्क्याच्या खाली असून, जळगाव त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या महिनाभरापासून समोर येत असून, अनलॉकच्या प्रक्रियेतही जिल्हा पहिल्या स्तरावरच कायम आहे. तपासण्यांवर अधिकाधिक भर देऊन रुग्णांना विलग करून, पुढील धोके टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे. मार्च, एप्रिलमध्ये जळगाव शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा थेट ५० टक्के नोंदविण्यात आला होता. तो आता एक ते दीड टक्क्यांवर आला आहे. २२ जूनच्या आठवडाभराच्या अहवालानुसार जिल्हाभरात ३७,७२७ तपासण्या झाल्या असून, त्यात ३०१ बाधित आढळून आले आहेत. पाॅझिटिव्हिटी नियंत्रणात असल्याने निर्बंधांच्या बाबतीत जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा दिवसेंदिवस अधिक सक्षम करण्यावर भर देत असून, आगामी तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा सज्ज असल्याचे आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. यात जीएमसीत दोन प्रकल्प असून, दहा प्रकल्प जिल्ह्यात विविध ठिकाणी उभे केले जात आहे. यासह मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन टँकही उभा राहात आहे. शिवाय खासगी कोविड रुग्णालयांनाही ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. शिवाय बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडवाढीबाबतही प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. सर्वच तालुक्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जळगाव शहरात मोठा दिलासा

रुग्णसंख्या व मृत्यूच्या बाबतीत गेल्या वीस दिवसांपासून विशेषत: शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. यात नियमित दहापेक्षा कमी रुग्ण समोर येत आहेत, तर वीस दिवसात तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मध्यंतरी दररोज सात ७ ते ८ मृत्यू नोंदविण्यात येत होते. ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या तीन दिवसात एक मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याचे समाधानकारक चित्र होते.

पॉझिटिव्हिटी रेट कमी असणे का असतो दिलासा?

पॉझिटिव्हिटी रेट अर्थात शंभर तपासण्यांमध्ये आढळून येणारे बाधितांचे प्रमाण होय. एकत्रित जिल्ह्यात मार्च, एप्रिलमध्ये हाच पॉझिटिव्हिटी रेट ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. याचा अर्थ त्यावेळी शंभर तपासण्यांमध्ये ३५ रुग्ण आढळून येत होते. हा दर आता ०.८ नोंदविण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे याचाच अर्थ की, कोरोना संसर्गाचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. दिवसाला आता ५० पेक्षाही कमी बाधित आढळून येत आहेत. दुसरीकडे चाचण्या पाच हजारांपेक्षा अधिक होत आहे. यामुळे पॉझिटिव्हिट रेट हा कमी असणे हा मोठा दिलासा असतो.

राज्यातील टॉप दहा जिल्हे

नांदेड : ०.२ टक्के.

जळगाव : ०.८ टक्के

परभणी : ०.९ टक्के

नागपूर : १. ० टक्के

वर्धा : १.१ टक्के

हिंगोली १.२ टक्के

भंडारा : १.३ टक्के

चंद्रपूर : १.३ टक्के

नंदुरबार : १.६ टक्के

अमरावती : १.७ टक्के