शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्याच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या ...

जळगाव : जिल्ह्याने कोविड सुधारणांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली असून, कोरोना रोखण्यात जिल्ह्याला यश येत आहे. २२ जूनच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८ टक्के अर्थात एक टक्क्यापेक्षाही कमी नोंदविण्यात आला आहे. राज्यात केवळ तीनच जिल्हे हे एक टक्क्याच्या खाली असून, जळगाव त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे समाधानकारक चित्र गेल्या महिनाभरापासून समोर येत असून, अनलॉकच्या प्रक्रियेतही जिल्हा पहिल्या स्तरावरच कायम आहे. तपासण्यांवर अधिकाधिक भर देऊन रुग्णांना विलग करून, पुढील धोके टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे. मार्च, एप्रिलमध्ये जळगाव शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा थेट ५० टक्के नोंदविण्यात आला होता. तो आता एक ते दीड टक्क्यांवर आला आहे. २२ जूनच्या आठवडाभराच्या अहवालानुसार जिल्हाभरात ३७,७२७ तपासण्या झाल्या असून, त्यात ३०१ बाधित आढळून आले आहेत. पाॅझिटिव्हिटी नियंत्रणात असल्याने निर्बंधांच्या बाबतीत जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा दिवसेंदिवस अधिक सक्षम करण्यावर भर देत असून, आगामी तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा सज्ज असल्याचे आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. यात जीएमसीत दोन प्रकल्प असून, दहा प्रकल्प जिल्ह्यात विविध ठिकाणी उभे केले जात आहे. यासह मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन टँकही उभा राहात आहे. शिवाय खासगी कोविड रुग्णालयांनाही ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. शिवाय बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडवाढीबाबतही प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. सर्वच तालुक्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जळगाव शहरात मोठा दिलासा

रुग्णसंख्या व मृत्यूच्या बाबतीत गेल्या वीस दिवसांपासून विशेषत: शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. यात नियमित दहापेक्षा कमी रुग्ण समोर येत आहेत, तर वीस दिवसात तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मध्यंतरी दररोज सात ७ ते ८ मृत्यू नोंदविण्यात येत होते. ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्याचा विचार केला असता गेल्या तीन दिवसात एक मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याचे समाधानकारक चित्र होते.

पॉझिटिव्हिटी रेट कमी असणे का असतो दिलासा?

पॉझिटिव्हिटी रेट अर्थात शंभर तपासण्यांमध्ये आढळून येणारे बाधितांचे प्रमाण होय. एकत्रित जिल्ह्यात मार्च, एप्रिलमध्ये हाच पॉझिटिव्हिटी रेट ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. याचा अर्थ त्यावेळी शंभर तपासण्यांमध्ये ३५ रुग्ण आढळून येत होते. हा दर आता ०.८ नोंदविण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे याचाच अर्थ की, कोरोना संसर्गाचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. दिवसाला आता ५० पेक्षाही कमी बाधित आढळून येत आहेत. दुसरीकडे चाचण्या पाच हजारांपेक्षा अधिक होत आहे. यामुळे पॉझिटिव्हिट रेट हा कमी असणे हा मोठा दिलासा असतो.

राज्यातील टॉप दहा जिल्हे

नांदेड : ०.२ टक्के.

जळगाव : ०.८ टक्के

परभणी : ०.९ टक्के

नागपूर : १. ० टक्के

वर्धा : १.१ टक्के

हिंगोली १.२ टक्के

भंडारा : १.३ टक्के

चंद्रपूर : १.३ टक्के

नंदुरबार : १.६ टक्के

अमरावती : १.७ टक्के