शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक दृष्टीकोन देऊन रुग्णांना दूर ठेवतात एकटेपणापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एक पथक जिल्हाभरातील कोविड सेंटरला जावून बाधित रुग्णांचे समुपदेशन करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एक पथक जिल्हाभरातील कोविड सेंटरला जावून बाधित रुग्णांचे समुपदेशन करत असून, त्यांना सकारात्मक दृष्टीकोन देऊन रुग्णांच्या मनातील भीती घालविण्याचे काम या पथकामार्फत पहिल्या लाटेपासून केले जात आहे. मन शांत ठेवले तर तुम्ही कशावरही मात करू शकता, असा सल्ला पथकामार्फत दिला जात आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असून, मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, यात कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांना धोका पाेहोचत असल्याचे समोर आल्यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य नियंत्रित राहावे यासाठी या पथकामार्फत कोविड सेंटरला जावून रुग्णांशी संवाद साधला जातो. या पथकात मानससोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखडे या कार्यक्रम अधिकारी असून, त्यांच्यासह चिकित्सक मानसतज्ज्ञ दौलत निमसे, मनोसामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनोविकृती परिचारक विनोद गडकर, रेकॉर्ड किपर मिलिंद बऱ्हाटे, चंद्रकांत ठाकरू हे या पथकात कार्यरत आहेत.

मानसिकता कशी होते खराब

कोविडची लागण झाल्यानंतर रुग्णाला धक्का बसतो, यात आयसोलेशन अर्थात एकटेपणाची भावना भीतीदायक वाटते. कानावर येणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मनोबल खचते. मात्र, अशास्थितीत रुग्णांशी कोणी संवाद साधला, त्यांचे विचार कोणीतरी ऐकून घेतेय, त्यांना कोणीतरी समजून सकारात्मक वाट दाखवतेय, याची जेव्हा त्यांना जाणीव होते, तेव्हा त्यांची भीती दूर होते. त्यामुळे रुग्णांशी संवाद साधून त्यांना सकारात्मक दृष्टीकोन आम्ही देत असतो, असे डॉ. नारखेडे यांनी सांगितले.

फोनवर रोज शंभर रुग्णांचे समुपदेशन

प्रत्येक कोविड केअर सेंटरला जाणे जरी शक्य नसले, तरी एका टोल फ्री क्रमांकावर या पथकाद्वारे रुग्णांच्या मानसिक समस्या दूर केल्या जातात. यात किमान शंभर ते दीडशे रुग्णांचे फोनवर समुपदेशन केल जाते. यातील बहुतांश कॉल हे भीती, नैराश्य या संदर्भातील असतात, असे डॉ. कांचन नारखडे यांनी सांगितले.

काय होताहेत सकारात्मक परिणाम

रुग्ण नैराश्यातून बाहेर पडतात.

त्यांची ऊर्जा वाढून त्यांना एक आत्मविश्वास येतो.

रुग्णांच्या मनातून भीती निघून जावून ते सकारात्मकतेने आजाराचा सामना करतात व बरे होतात.

रुग्णांचे मनोबल वाढते.

भीतीने शरीर प्रतिकारशक्तीवर केंद्रीत होऊ शकत नाही

कोरोनाशी लढण्यात तुमच्या प्रतिकारशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. अशास्थितीत जर मन शांत असेल तर शरीर प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करू शकते, मात्र आधीच डोक्यात नकारात्मक विचार, भीती असेल तर शरीर त्यावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. यासाठी साधे उदाहरण म्हणजे आपल्या डोक्यात काही विचारांचा काहूर असेल तर कुठल्याच कामात लक्ष लागत नाही, तसेच हे आहे. त्यामुळे भीती न बाळगता जेवढे तुम्ही स्टेबल राहाल, तेवढे शरीर चांगला प्रतिसाद देईल, असे डॉ. कांचन नारखेडे यांनी सांगितले.