शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

सकारात्मक दृष्टीकोन देऊन रुग्णांना दूर ठेवतात एकटेपणापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एक पथक जिल्हाभरातील कोविड सेंटरला जावून बाधित रुग्णांचे समुपदेशन करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एक पथक जिल्हाभरातील कोविड सेंटरला जावून बाधित रुग्णांचे समुपदेशन करत असून, त्यांना सकारात्मक दृष्टीकोन देऊन रुग्णांच्या मनातील भीती घालविण्याचे काम या पथकामार्फत पहिल्या लाटेपासून केले जात आहे. मन शांत ठेवले तर तुम्ही कशावरही मात करू शकता, असा सल्ला पथकामार्फत दिला जात आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असून, मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, यात कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांना धोका पाेहोचत असल्याचे समोर आल्यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य नियंत्रित राहावे यासाठी या पथकामार्फत कोविड सेंटरला जावून रुग्णांशी संवाद साधला जातो. या पथकात मानससोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखडे या कार्यक्रम अधिकारी असून, त्यांच्यासह चिकित्सक मानसतज्ज्ञ दौलत निमसे, मनोसामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनोविकृती परिचारक विनोद गडकर, रेकॉर्ड किपर मिलिंद बऱ्हाटे, चंद्रकांत ठाकरू हे या पथकात कार्यरत आहेत.

मानसिकता कशी होते खराब

कोविडची लागण झाल्यानंतर रुग्णाला धक्का बसतो, यात आयसोलेशन अर्थात एकटेपणाची भावना भीतीदायक वाटते. कानावर येणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मनोबल खचते. मात्र, अशास्थितीत रुग्णांशी कोणी संवाद साधला, त्यांचे विचार कोणीतरी ऐकून घेतेय, त्यांना कोणीतरी समजून सकारात्मक वाट दाखवतेय, याची जेव्हा त्यांना जाणीव होते, तेव्हा त्यांची भीती दूर होते. त्यामुळे रुग्णांशी संवाद साधून त्यांना सकारात्मक दृष्टीकोन आम्ही देत असतो, असे डॉ. नारखेडे यांनी सांगितले.

फोनवर रोज शंभर रुग्णांचे समुपदेशन

प्रत्येक कोविड केअर सेंटरला जाणे जरी शक्य नसले, तरी एका टोल फ्री क्रमांकावर या पथकाद्वारे रुग्णांच्या मानसिक समस्या दूर केल्या जातात. यात किमान शंभर ते दीडशे रुग्णांचे फोनवर समुपदेशन केल जाते. यातील बहुतांश कॉल हे भीती, नैराश्य या संदर्भातील असतात, असे डॉ. कांचन नारखडे यांनी सांगितले.

काय होताहेत सकारात्मक परिणाम

रुग्ण नैराश्यातून बाहेर पडतात.

त्यांची ऊर्जा वाढून त्यांना एक आत्मविश्वास येतो.

रुग्णांच्या मनातून भीती निघून जावून ते सकारात्मकतेने आजाराचा सामना करतात व बरे होतात.

रुग्णांचे मनोबल वाढते.

भीतीने शरीर प्रतिकारशक्तीवर केंद्रीत होऊ शकत नाही

कोरोनाशी लढण्यात तुमच्या प्रतिकारशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. अशास्थितीत जर मन शांत असेल तर शरीर प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करू शकते, मात्र आधीच डोक्यात नकारात्मक विचार, भीती असेल तर शरीर त्यावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. यासाठी साधे उदाहरण म्हणजे आपल्या डोक्यात काही विचारांचा काहूर असेल तर कुठल्याच कामात लक्ष लागत नाही, तसेच हे आहे. त्यामुळे भीती न बाळगता जेवढे तुम्ही स्टेबल राहाल, तेवढे शरीर चांगला प्रतिसाद देईल, असे डॉ. कांचन नारखेडे यांनी सांगितले.