शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणावरून श्रेयाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:07 IST

मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षीच केली होती घोषणा

ठळक मुद्दे आता दिल्लीच्या बैठकीत निर्णय झाल्याचा होतोय दावाकामाला गती देखील आलीय दुहेरी करण करण्याची काढली होती निविदा

जळगाव: जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरण कामाच्या मंजुरीवरून श्रेयाचे राजकारण सुरू झाले असून दुपरीकरणाऐवजी उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मागील वर्षीच मुख्यमंत्र्यांनी केली असताना बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी झालेल्या बैठकीत याच कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा आमदार खडसे गटाकडून करण्यात आला आहे.

जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय भुप्रुष्ट व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव दौºयात या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणाही केली होती. या मार्गाच्या कामास जास्त खर्च येत असल्यामुळे चौपदरीकणाऐवजी दुहेरी करण करण्याची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे चौपदरीकरणाचा निर्णय केवळ घोषणाच ठरते की काय? असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र मागील वर्षीच दिल्ली येथील बैठकीतच हा विषय मार्गी लागला असून उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाल्याचे टष्ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर या कामाला गती देखील आली आहे. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत माजी मंत्री खडसे यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरणच करण्याची मागणी लावून धरली. ती मान्य करीत या संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरणाऐवजी चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा खडसे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाच्या मंजुरीवरून भाजपातच श्रेयाचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.