शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणावरून श्रेयाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:07 IST

मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षीच केली होती घोषणा

ठळक मुद्दे आता दिल्लीच्या बैठकीत निर्णय झाल्याचा होतोय दावाकामाला गती देखील आलीय दुहेरी करण करण्याची काढली होती निविदा

जळगाव: जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरण कामाच्या मंजुरीवरून श्रेयाचे राजकारण सुरू झाले असून दुपरीकरणाऐवजी उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मागील वर्षीच मुख्यमंत्र्यांनी केली असताना बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी झालेल्या बैठकीत याच कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा आमदार खडसे गटाकडून करण्यात आला आहे.

जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय भुप्रुष्ट व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव दौºयात या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणाही केली होती. या मार्गाच्या कामास जास्त खर्च येत असल्यामुळे चौपदरीकणाऐवजी दुहेरी करण करण्याची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे चौपदरीकरणाचा निर्णय केवळ घोषणाच ठरते की काय? असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र मागील वर्षीच दिल्ली येथील बैठकीतच हा विषय मार्गी लागला असून उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाल्याचे टष्ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर या कामाला गती देखील आली आहे. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत माजी मंत्री खडसे यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरणच करण्याची मागणी लावून धरली. ती मान्य करीत या संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरणाऐवजी चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा खडसे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाच्या मंजुरीवरून भाजपातच श्रेयाचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.