शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणावरून श्रेयाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:07 IST

मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षीच केली होती घोषणा

ठळक मुद्दे आता दिल्लीच्या बैठकीत निर्णय झाल्याचा होतोय दावाकामाला गती देखील आलीय दुहेरी करण करण्याची काढली होती निविदा

जळगाव: जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरण कामाच्या मंजुरीवरून श्रेयाचे राजकारण सुरू झाले असून दुपरीकरणाऐवजी उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मागील वर्षीच मुख्यमंत्र्यांनी केली असताना बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी झालेल्या बैठकीत याच कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा आमदार खडसे गटाकडून करण्यात आला आहे.

जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय भुप्रुष्ट व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव दौºयात या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणाही केली होती. या मार्गाच्या कामास जास्त खर्च येत असल्यामुळे चौपदरीकणाऐवजी दुहेरी करण करण्याची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे चौपदरीकरणाचा निर्णय केवळ घोषणाच ठरते की काय? असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र मागील वर्षीच दिल्ली येथील बैठकीतच हा विषय मार्गी लागला असून उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाल्याचे टष्ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर या कामाला गती देखील आली आहे. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत माजी मंत्री खडसे यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरणच करण्याची मागणी लावून धरली. ती मान्य करीत या संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरणाऐवजी चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा खडसे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाच्या मंजुरीवरून भाजपातच श्रेयाचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.