शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील राजकीय वादळ शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीनेही यात आता माघार घेतल्याचे चित्र असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी केवळ ही वातावरण निर्मिती होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला बहुमत राखता आले नव्हते. मात्र, काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आली. यात चार सदस्यीय काँग्रेस पक्षाला एक सभापतीपदही देण्यात आले होते. मात्र, ज्यांना सभापतीपद मिळाले, ते अडीच वर्षांनंतरच्या निवडणुकीत भाजपच्या गोटात दाखल झाले व अगदी सत्तांतराच्या जवळ असलेल्या सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील सत्तांतरानंतर सर्वात आधी जिल्हा परिषदेत सत्तांतर होईल, असे वारे निर्माण झाले होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एक-एक सदस्य फुटले आणि महाविकासचे हे गणित फसले व पुन्हा भाजपची सत्ता आली.

महापलिकेनंतर जिल्हा परिषदेत जोर

महापालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तातरानंतर जिल्हा परिषदेतही महाविकासची सत्ता आणण्यासाठी गटनेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. यासाठी सुरूवातीला एकनाथराव खडसे, त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यात आली होती. यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविकासच्या सदस्यांनी बहिष्कारास्त्र अवलंबले होते. मात्र, या सभेनंतर ठोस कसलीही पावले उचलण्यात न आल्याने या राजकीय वादळाला ‘ब्रेक’ लागला आहे.

कोरोनाने बंधने

कोरोना जिल्हा परिषदेत उपस्थितीवर बंधने आणली आहेत. जिल्ह्यात सर्वत्रच रुग्णसंख्या वाढत असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांवरही बंधने आली आहेत. अशातच आता महिनाभर तरी कोणतीही सभा नसल्यामुळे राजकीय वातावरण शांतच राहणार आहे. शिवाय गणित जुळवणे शक्य नाही, असे खुद्द काही सदस्यच सांगत आहेत. त्यामुळे आगामी ८ महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांवरच त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

भाजपला निवडणुका कठीण

पुढील निवडणुका या भाजपसाठी कठीण असतील, असा संदेश विरोधक देत आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आताही पडद्यामागून महाविकासच्या हातात हात देत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये तर ते स्पष्टपणे आमच्यासोबत राहतील, असा दावा काही विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी राहणार नाही.