शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

जिल्हा परिषदेतील राजकीय वादळ शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अविश्वास ठरावाचे गणित जुळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी निर्माण झालेले राजकीय वादळ शांत झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीनेही यात आता माघार घेतल्याचे चित्र असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी केवळ ही वातावरण निर्मिती होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला बहुमत राखता आले नव्हते. मात्र, काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आली. यात चार सदस्यीय काँग्रेस पक्षाला एक सभापतीपदही देण्यात आले होते. मात्र, ज्यांना सभापतीपद मिळाले, ते अडीच वर्षांनंतरच्या निवडणुकीत भाजपच्या गोटात दाखल झाले व अगदी सत्तांतराच्या जवळ असलेल्या सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील सत्तांतरानंतर सर्वात आधी जिल्हा परिषदेत सत्तांतर होईल, असे वारे निर्माण झाले होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एक-एक सदस्य फुटले आणि महाविकासचे हे गणित फसले व पुन्हा भाजपची सत्ता आली.

महापलिकेनंतर जिल्हा परिषदेत जोर

महापालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तातरानंतर जिल्हा परिषदेतही महाविकासची सत्ता आणण्यासाठी गटनेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. यासाठी सुरूवातीला एकनाथराव खडसे, त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यात आली होती. यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविकासच्या सदस्यांनी बहिष्कारास्त्र अवलंबले होते. मात्र, या सभेनंतर ठोस कसलीही पावले उचलण्यात न आल्याने या राजकीय वादळाला ‘ब्रेक’ लागला आहे.

कोरोनाने बंधने

कोरोना जिल्हा परिषदेत उपस्थितीवर बंधने आणली आहेत. जिल्ह्यात सर्वत्रच रुग्णसंख्या वाढत असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांवरही बंधने आली आहेत. अशातच आता महिनाभर तरी कोणतीही सभा नसल्यामुळे राजकीय वातावरण शांतच राहणार आहे. शिवाय गणित जुळवणे शक्य नाही, असे खुद्द काही सदस्यच सांगत आहेत. त्यामुळे आगामी ८ महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांवरच त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

भाजपला निवडणुका कठीण

पुढील निवडणुका या भाजपसाठी कठीण असतील, असा संदेश विरोधक देत आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आताही पडद्यामागून महाविकासच्या हातात हात देत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये तर ते स्पष्टपणे आमच्यासोबत राहतील, असा दावा काही विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी राहणार नाही.