शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व ...

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व राज्य शासनावर केलेल्या टीकेनंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे ऐन कोरोना काळात स्वत:च्या मतदार संघातील व जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी थांबण्याऐवजी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्याआधी त्यांनी काही आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेथून परतल्यावर मात्र त्यांनी कोरोना परिस्थिती व नियोजनाचा आढावा घेत नियोजन व्यवस्थित नसल्याची टीका केली होती. तसेच राज्य शासनावरही टीका केली होती. त्याला विरोधकांकडूनही तसेच उत्तर मिळाले. पहिल्यांदा खडसे यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे खडसे-महाजन असे आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. वादाची पातळीही प्रथमच कधी नव्हे इतकी खालावलेली दिसली. तर इतर विरोधकांनीही महाजन यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका सुरू केली. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना धारेवर धरत ते अथवा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना महापालिकेला नियोजनच्या निधीतून किती मदत केली? असा सवाल केला आहे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करू, जळगाव शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशी आश्वासने गिरीश महाजन यांनी दिली. तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे खास होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता साहजिकच महाजन यावर पटलवार करणार, हे उघड आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी सरसावण्याऐवजी राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांनी स्वत: कोविड सेंटर सुरू केल्याचे, तसेच नागरिकांना शक्य ती मदत केल्याचे दिसत असताना जिल्ह्यात मात्र राजकीय मंडळी मदतीसाठी अशी पुढे आलेली दिसली नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मात्र जेव्हा लोकांचे हाल होऊन सहनशीलता संपत यायला लागली, तेव्हा राजकारण्यांना जाग आली. मग एप्रिल महिन्यात हेल्पलाईनसारखे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून राजकारण न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी शक्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.