शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व ...

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व राज्य शासनावर केलेल्या टीकेनंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे ऐन कोरोना काळात स्वत:च्या मतदार संघातील व जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी थांबण्याऐवजी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्याआधी त्यांनी काही आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेथून परतल्यावर मात्र त्यांनी कोरोना परिस्थिती व नियोजनाचा आढावा घेत नियोजन व्यवस्थित नसल्याची टीका केली होती. तसेच राज्य शासनावरही टीका केली होती. त्याला विरोधकांकडूनही तसेच उत्तर मिळाले. पहिल्यांदा खडसे यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे खडसे-महाजन असे आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. वादाची पातळीही प्रथमच कधी नव्हे इतकी खालावलेली दिसली. तर इतर विरोधकांनीही महाजन यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका सुरू केली. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना धारेवर धरत ते अथवा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना महापालिकेला नियोजनच्या निधीतून किती मदत केली? असा सवाल केला आहे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करू, जळगाव शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशी आश्वासने गिरीश महाजन यांनी दिली. तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे खास होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता साहजिकच महाजन यावर पटलवार करणार, हे उघड आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी सरसावण्याऐवजी राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांनी स्वत: कोविड सेंटर सुरू केल्याचे, तसेच नागरिकांना शक्य ती मदत केल्याचे दिसत असताना जिल्ह्यात मात्र राजकीय मंडळी मदतीसाठी अशी पुढे आलेली दिसली नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मात्र जेव्हा लोकांचे हाल होऊन सहनशीलता संपत यायला लागली, तेव्हा राजकारण्यांना जाग आली. मग एप्रिल महिन्यात हेल्पलाईनसारखे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून राजकारण न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी शक्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.