शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व ...

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व राज्य शासनावर केलेल्या टीकेनंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे ऐन कोरोना काळात स्वत:च्या मतदार संघातील व जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी थांबण्याऐवजी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्याआधी त्यांनी काही आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेथून परतल्यावर मात्र त्यांनी कोरोना परिस्थिती व नियोजनाचा आढावा घेत नियोजन व्यवस्थित नसल्याची टीका केली होती. तसेच राज्य शासनावरही टीका केली होती. त्याला विरोधकांकडूनही तसेच उत्तर मिळाले. पहिल्यांदा खडसे यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे खडसे-महाजन असे आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. वादाची पातळीही प्रथमच कधी नव्हे इतकी खालावलेली दिसली. तर इतर विरोधकांनीही महाजन यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका सुरू केली. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना धारेवर धरत ते अथवा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना महापालिकेला नियोजनच्या निधीतून किती मदत केली? असा सवाल केला आहे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करू, जळगाव शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशी आश्वासने गिरीश महाजन यांनी दिली. तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे खास होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता साहजिकच महाजन यावर पटलवार करणार, हे उघड आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी सरसावण्याऐवजी राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांनी स्वत: कोविड सेंटर सुरू केल्याचे, तसेच नागरिकांना शक्य ती मदत केल्याचे दिसत असताना जिल्ह्यात मात्र राजकीय मंडळी मदतीसाठी अशी पुढे आलेली दिसली नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मात्र जेव्हा लोकांचे हाल होऊन सहनशीलता संपत यायला लागली, तेव्हा राजकारण्यांना जाग आली. मग एप्रिल महिन्यात हेल्पलाईनसारखे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून राजकारण न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी शक्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.