शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व ...

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व राज्य शासनावर केलेल्या टीकेनंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे ऐन कोरोना काळात स्वत:च्या मतदार संघातील व जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी थांबण्याऐवजी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्याआधी त्यांनी काही आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेथून परतल्यावर मात्र त्यांनी कोरोना परिस्थिती व नियोजनाचा आढावा घेत नियोजन व्यवस्थित नसल्याची टीका केली होती. तसेच राज्य शासनावरही टीका केली होती. त्याला विरोधकांकडूनही तसेच उत्तर मिळाले. पहिल्यांदा खडसे यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे खडसे-महाजन असे आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. वादाची पातळीही प्रथमच कधी नव्हे इतकी खालावलेली दिसली. तर इतर विरोधकांनीही महाजन यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका सुरू केली. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना धारेवर धरत ते अथवा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना महापालिकेला नियोजनच्या निधीतून किती मदत केली? असा सवाल केला आहे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करू, जळगाव शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशी आश्वासने गिरीश महाजन यांनी दिली. तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे खास होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता साहजिकच महाजन यावर पटलवार करणार, हे उघड आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी सरसावण्याऐवजी राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांनी स्वत: कोविड सेंटर सुरू केल्याचे, तसेच नागरिकांना शक्य ती मदत केल्याचे दिसत असताना जिल्ह्यात मात्र राजकीय मंडळी मदतीसाठी अशी पुढे आलेली दिसली नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मात्र जेव्हा लोकांचे हाल होऊन सहनशीलता संपत यायला लागली, तेव्हा राजकारण्यांना जाग आली. मग एप्रिल महिन्यात हेल्पलाईनसारखे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून राजकारण न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी शक्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.