शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय घडामोडी शिवसेना स्टाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले गेले. जळगाव-मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधला जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी ...

नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले गेले. जळगाव-मुक्ताईनगरनंतर अबकी बार भुसावळवर निशाणा साधला जात आहे. भाजपचे काही पदाधिकारी व नगरसेवक नजीकच्या काळामध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या कुटुंबियांनी जाहीररीत्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे पदावर आहेत ते फक्त औपचारिक असल्याचे दिसून येत आहे. निम्मे भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेले, तर भुसावळचे उरलेले काही नगरसेवक हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवबंधन बांधणार असे येथील राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

येत्या सहा महिन्यांत नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवता सत्ताधारी पक्षासोबत गेल्यास नक्कीच शहरातील विकास कामे मार्गी लागतील, अशी यामागची कारणे दिसून येत आहेत. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनीही भुसावळकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते असो की अमृत योजना प्रत्येक कामाकडे जातीने लक्ष देऊन भरघोस निधी उपलब्ध करून देत आहेत. जळगाव मुक्ताईनगरनंतर आता भुसावळ भाजपला खिंडार पडणार, असे चित्र असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.

वादळी तडाख्याने शेतकरी हवालदिल

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतांतील उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. कुणाच्या भिंती पडल्या, तर मुख्य रस्त्यावर डेरेदार झाडे उन्मळून

पडली आहेत. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनातर्फे तालुक्‍यातील काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले आहेत.

कोरोना आटोक्यात

जिल्ह्यामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या भुसावळ तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून बऱ्याच अंशी कोरोना आटोक्यात आला आहे. रुग्ण नसल्यामुळे खाजगी तीन कोरोना सेंटर बंद झाले आहेत. जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहराला पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची फिराफिर होत आहे. सेंटरवर लस कमी व मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. भुसावळ येथील प्रत्येक सेंटरवर आलेल्या लसींचे समसमान वाटप व्हावे, म्हणजे नागरिकांची पळापळ होणार नाही.