शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वॉटरमीटर, अपार्टमेंटच्या नळकनेक्शन देण्याचे धोरण निश्चित होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजेनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजेनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सर्व काम पुर्ण होणार आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून योजना पुर्ण झाल्यानंतर वॉटरमीटर बसविणे, अपार्टमेंटला एकच की वैयक्तिक नळ कनेक्शन द्यावे की नाही, वाढीव भागात योजनेचे थांबलेले काम अशा बाबी अद्याप पुर्ण कराव्या लागणार आहे. मात्र, मनपा प्रशासन याबाबत दुर्लक्ष करत असून, वॉटरमीटर, नळ कनेक्शनबाबत मनपाचे धोरण निश्चित झालेले दिसून येत नाही.

अमृत अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम जवळपास ९० टक्के पुर्ण झाले आहे. तसेच मनपा पाणी पुरवठा विभागाकडून नळ देण्याचे काम देखील सुरु केले आहे. मात्र, अपार्टमेंटला केवळ एकच कनेक्शन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला जून्या अपार्टमेंटमधील रहिवाश्यांचा विरोध असून, अपार्टमेंट रहिवाश्यांना देखील स्वतंत्र कनेक्शन देण्याची मागणी रहिवाश्यांकडून केली जात आहे. याबाबत मनपा महासभा व स्थायी समितीच्या सभेत देखील अनेकवेळा चर्चा होवूनही मनपाकडून अद्यापही धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे योजना पुर्ण झाल्यानंतर देखील अनेक अडथळ्यांची शर्यत मनपा प्रशासनाला पार करावी लागणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून निर्णयाची प्रतीक्षा

१. एकीकडे नळ कनेक्शन देण्याचे काम मनपाकडून सुरु झाले असताना दुसरीकडे अपार्टमेंटमधील कनेक्शनबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. नव्याने बांधकाम झालेल्या अपार्टमेंटमध्ये सम ची व्यवस्था असल्याने या अपार्टमेंटमध्ये एक किंवा दोन कनेक्शन दिल्यास त्याठिकाणी अडचण येत नाही. तसेच अनेक नवीन अपार्टमेंटमध्ये नळ कनेक्शन देण्यास सुरुवात देखील झाली आहे.

२. शहरात सुमारे १५० ते २०० जुने अपार्टमेंटचे बांधकाम हे ३० ते ३५ वर्षापुर्वीचे आहे. या अपार्टमेंटचे बांधकाम जुन्या नियमानुसार आहे. त्यामुळे संपुर्ण जागेचा वापर बांधकामासाठी केलेला आहे. अनेक ठिकाणी इमारतीचे बांधकाम जुने झाले असून भुमीगत पाण्याची टाकी देखील नाही. नव्याने भुमीगत पाण्याची टाकी करायचे म्हटले तरी पुरेशी जागा नाही. त्यामुळे संपुर्ण इमारतीच्या बांधकामाला धोका पोहचण्याची भिती आहे. त्यामुळे या जुन्या अपार्टमेंटमध्ये नवीन धोरणानुसार नळकनेक्शन कसे द्यायचे हा वादाचा मुद्दा झाला आहे.

वॉटरमीटरबाबत अद्यापही निर्णय नाही

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खाजगी कंपनी कडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाचा अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.