शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:10 IST

हजेरी मास्तरचा जाच

ठळक मुद्देचार जणांच्या नावाने लिहिली चिठ्ठी

जळगाव : ड्युटी लावताना त्रास दिला जात असल्यामुळे श्रध्दा अर्जुन आहेर (वय ३१, रा.दक्षता पोलीस लाईन,जळगाव) या महिला पोलीस कर्मचाऱ्याने झोपेच्या गोळ्या सेवन करुन तालुका पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळ्या सेवन करण्यापूर्वी श्रध्दा यांनी त्रास देणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रध्दा आहेर या तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी त्यांची दुपारी २ ते रात्री ८ अशी ड्युटी होती. गेल्या काही दिवसापासून हजेरी मास्तर अमीर तडवी हे गैरसोयीची ड्युटी लावत आहेत.कुटुंबात कोणीतरी आजारी असल्याने गैरसोयीची ड्युटी लावू नका म्हणून त्यांनी हजेरी मास्तर व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना विनंती केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. मर्जीतल्या कर्मचाºयांना सोयीची ड्युटी लावली जाते व इतर कर्मचाºयांना त्रास देण्याच्या हेतून गैरसोयीची ड्युटी लावली जाते असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले असून त्याच निरीक्षक दिलीप भागवत, हजेरी मास्तर अमीर तडवी, उमेश भांडारकर, महिला कर्मचारी दुसाने व धनके यांचेही नावे चिठ्ठीत आहेत.माझ्या मरणाला हेच चार जण जबाबदार आहेत, असे त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावाने म्हटले आहे. पती योगेश सोनवणे यांच्या नावाचाही उल्लेख असून स्वत: व मुलांची काळजी घेण्यासह त्यांचे शिक्षण चांगले करा असा उल्लेख आहे.अधिकारी, कर्मचाºयांची धावपळघटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, उपनिरीक्षक कदीर तडवी यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. श्रध्दा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमके कोणाचे नाव आहे व त्यात काय उल्लेख आहे याबाबत कर्मचाºयांकडून माहिती काढण्याचे काम सुरु होते.आॅन ड्युटीच घेतल्या गोळ्याश्रध्दा यांनी ड्युटी संपण्याच्या आधीच झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांना काही वेळाने अस्वस्थ वाटू लागले. पतीला त्यांनी बोलावून घेतले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे पोलीस वाहनातून त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर आणखीन प्रकृती बिघडल्याने पती व इतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी तातडीने उपचार केले असता श्रध्दा यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या सेवन केल्याचे स्पष्ट झाले. रात्री साडे अकरा वाजता त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ.बिराजदार यांनी ‘लोकमत’ ला दिली.