शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

ट्रॅव्हल्स थांब्याबाबत पोलिसांच्या पोकळ घोषणा

By admin | Updated: October 9, 2015 01:03 IST

जळगाव : ट्रॅव्हल्सचा थांबा गणेशोत्सवानंतर सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

जळगाव : बाहेरगावी जाणा:या सर्व ट्रॅव्हल्सचा एकाच ठिकाणी थांबा असावा, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केवळ घोषणाबाजीच सुरू आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी कायम आहे. जागा तयार होवूनही थांबा सुरू झालेला नाही. गणेशोत्सवानंतर हा थांबा सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

जागा शोधण्यात गेले पंधरा दिवस

प्रारंभीच्या काळात जागा शोधण्यातच पंधरा दिवस गेले. अनेक भागातील सहा ठिकाणांचा पर्याय शोधल्यानंतर त्यावर एकमत करण्यासाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली. समितीतील सदस्य वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे, प्रमोद झांबरे यांच्यासह अन्य काही जणांनी खान्देश मिल व विठ्ठल मंदिर संस्थानची नेरी नाक्याजवळील अशा दोन जागांचा सव्र्हे केल्यानंतर विठ्ठल मंदिर संस्थानच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ट्रॅव्हल्सचालकांकडून दिरंगाई

अकरा महिन्यांच्या कराराने ही जागा भाडे तत्त्वावर घेण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेतला. रस्त्यातील खांब हटविण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मनपाने वीज पुरविण्याचे आश्वासन दिले. जागेवरच मुरूम टाकण्यात आला. ट्रॅव्हल्स आजच थांबू शकतील अशी जागा तयार झालेली आहे. परंतु काही ट्रॅव्हल्सचालकांकडूनच यात दिरंगाई केली जात आहे. सुरुवातीला गणेशोत्सवानंतर थांबा कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले होते. आता नवरात्रौत्सव व दसरा, दिवाळी हे सिझन असल्याने ट्रॅव्हल्स बाहेर जाऊ नये अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. त्यासाठी पितृपक्षाचेही कारण पुढे केले जात आहे.

दावाही फेटाळला

एका ट्रॅव्हल्समालकाने या थांब्याला विरोध म्हणून न्यायालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोणतेही कारण नसताना थांबा का सुरू केला जात नाही, असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. नवरात्रौत्सवापूर्वी हा थांबा सुरू केला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

थांब्याचे काम झाले आहे. विजेची व खांबांची किरकोळ अडचण आहे. ते काम झाले की थांबा सुरू करू. कुठल्याही परिस्थितीत हा थांबा सुरू होईलच.

-डॉ.जालिंदर सुपेकर,

पोलीस अधीक्षक