शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

ट्रॅव्हल्स थांब्याबाबत पोलिसांच्या पोकळ घोषणा

By admin | Updated: October 9, 2015 01:03 IST

जळगाव : ट्रॅव्हल्सचा थांबा गणेशोत्सवानंतर सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

जळगाव : बाहेरगावी जाणा:या सर्व ट्रॅव्हल्सचा एकाच ठिकाणी थांबा असावा, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केवळ घोषणाबाजीच सुरू आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी कायम आहे. जागा तयार होवूनही थांबा सुरू झालेला नाही. गणेशोत्सवानंतर हा थांबा सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे.

जागा शोधण्यात गेले पंधरा दिवस

प्रारंभीच्या काळात जागा शोधण्यातच पंधरा दिवस गेले. अनेक भागातील सहा ठिकाणांचा पर्याय शोधल्यानंतर त्यावर एकमत करण्यासाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली. समितीतील सदस्य वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे, प्रमोद झांबरे यांच्यासह अन्य काही जणांनी खान्देश मिल व विठ्ठल मंदिर संस्थानची नेरी नाक्याजवळील अशा दोन जागांचा सव्र्हे केल्यानंतर विठ्ठल मंदिर संस्थानच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ट्रॅव्हल्सचालकांकडून दिरंगाई

अकरा महिन्यांच्या कराराने ही जागा भाडे तत्त्वावर घेण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेतला. रस्त्यातील खांब हटविण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मनपाने वीज पुरविण्याचे आश्वासन दिले. जागेवरच मुरूम टाकण्यात आला. ट्रॅव्हल्स आजच थांबू शकतील अशी जागा तयार झालेली आहे. परंतु काही ट्रॅव्हल्सचालकांकडूनच यात दिरंगाई केली जात आहे. सुरुवातीला गणेशोत्सवानंतर थांबा कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले होते. आता नवरात्रौत्सव व दसरा, दिवाळी हे सिझन असल्याने ट्रॅव्हल्स बाहेर जाऊ नये अशी अनेकांची मानसिकता झाली आहे. त्यासाठी पितृपक्षाचेही कारण पुढे केले जात आहे.

दावाही फेटाळला

एका ट्रॅव्हल्समालकाने या थांब्याला विरोध म्हणून न्यायालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोणतेही कारण नसताना थांबा का सुरू केला जात नाही, असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जात आहे. नवरात्रौत्सवापूर्वी हा थांबा सुरू केला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

थांब्याचे काम झाले आहे. विजेची व खांबांची किरकोळ अडचण आहे. ते काम झाले की थांबा सुरू करू. कुठल्याही परिस्थितीत हा थांबा सुरू होईलच.

-डॉ.जालिंदर सुपेकर,

पोलीस अधीक्षक