शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या संसारात विष कालविणा-या पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात, सोयगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:19 IST

तिन्ही मुलांचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू

ठळक मुद्देगावात हळहळपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 -  शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने विषबाधा होऊन त्याच्या तीन मुलांचा जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर त्याच्या प}ीवर उपचार सुरु आहेत. स्वत:च्या संसारात विष कालवल्याची ही हृदयद्रावक घटना सोयगाव तालुक्यातील न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री घडली. दरम्यान, पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या शेतक:यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू रतन राठोड हा शेतकरी न्हावी तांडा येथे आपली प}ी कावेरीबाई (32), मुलगी ज्योती (13), मोगली (9) व मुलगा राहुल (11) यांच्यासह राहतो. सोमवारी सायंकाळी राजूने प}ी शेतातून घरी येण्याच्या आधी घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात पोलो नावाचे विषारी औषध कालवले. काही वेळानंतर त्याची प}ी घरी आली व तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने जेवण केले. जेवताना शेजारील दिनेश राठोडनेही येथेच जेवण केले. मात्र राजू नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री या पाचही जणांना उलटय़ा होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील राहुल व मोगली यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविले. यातील ज्योती व मोगली यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता राहुल याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी सोयगावजवळील धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू राठोड यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. परंतु तो तोंड उघडण्यास तयार नाही. रात्री उशिरापयर्ंत पोलीस त्याची चौकशी करीत होते. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापयर्ंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले. 

घरच्या प्रमुखानेच स्वत:च्या संसारात विष कालवल्याने त्याला आपल्या तिन्ही पोटच्या गोळ्यांना गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरा या मुलांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर राजकीय मंडळींसह सोयगाव पोलिसांनी न्हावी तांडा येथे भेटी देऊन घटनेचा उलगडा करण्याचा प्रय} केला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून राजूने कुटुंब संपविण्याचा प्रय} केला असावा, अशी चर्चा गावात सुरु आहे.